शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जमिनींची संयुक्त मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या ...

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कोल्हापूर ते सातारा दरम्यान निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक संजय मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, विनायक जाधव, विकास थोरात यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या दुपदरी करण्याच्या कामात जाणार आहेत त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांचे खरेदीपत्र करून देण्यात यावे. रेल्वेच्या खालून पाइपलाइन घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शेतकऱ्यांना रेल्वे रुळावरून ये-जा करण्यासाठी मोफत परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.

- चौकट

श्रीनिवास पाटील यांनीही घेतली दखल

सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मध्य रेल्वे दुहेरीकरणाच्या भूसंपादन व शेतकऱ्यांच्या रेल्वे लाइनलगतचे शेतात जाणारे शिवार रस्ते, शेतीच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोफत क्रॉसिंग, प्रकल्पग्रस्त दाखले या समस्येवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगत रेल्वे प्रशासनाला या प्रश्नाची दाहकता समजावून दिली होती.