शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

सातारा जिल्ह्यातील गावात १४ टाक्यांचा थाट; पाण्याचा ठणठणाट!

By नितीन काळेल | Updated: May 21, 2024 19:29 IST

कंत्राटदारावर मेहेरबानी : सासवडमध्ये टँकरचे माणसी २० लिटर पाणी; शाैचाचे काय?

सातारा : फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) येथे वर्षापासून टँकर आहे. लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत आहे. त्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आलीय. त्यातच जादा टँकरही मिळाला नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तर गावात पाण्याच्या १४ टाक्या असल्या तरी ठणठणाट आहे. कंत्राटदारांवरील मेहेरबानीसाठीच योजना राबविल्याचा आरोपही होत आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सासवड गाव. लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. तर गावाला १४ जूनपासून टँकर सुरू झाला तो आजही बंद नाही. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातील अनेक टाक्यांत पाणीच कधी पडले नाही, असे ग्रामस्थच सांगतात. तर गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा होतो.भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजनाही आहेत; पण सध्यातरी याचा काहीच फायदा होत नाही. कालव्याला पाणी आले तरच पेयजल योजना सुरू राहते. गावात पाण्यासाठी आणखी एक टाकी बांधण्यात येत आहे; पण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी उद्भव स्त्रोतच माहीत नाही मग टाक्या आणि योजना करून काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच एवढ्या पाणी योजना आणि टाक्या म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदारांचीच मिलीभगत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करू लागलेत.

गावाला सध्या ५५ हजार लिटर पाणी मंजूर आहे. टँकरद्वारे माणसी २० लिटर, मोठ्या जनावरांना ३५ आणि लहान जनावरांना १० लिटर याप्रमाणे पुरवठा होतोय. हे पाणीही पुरेसे होत नाही. यासाठी गावाने एक लाख लिटर पाणी मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. यासाठी खासगी टँकरमधून पाणी घ्यायचे झाल्यास १२०० रुपयांना ५ हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातच गावात जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठीही विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.

चारा डेपोची मागणी धूळखात..सासवडमध्ये पाण्याचाच प्रश्न नाही, तर चाराटंचाईही तीव्र आहे. खरीप आणि रब्बी हंगामही आला नाही. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे. जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणीही केली; पण पुढे काहीच झाले नाही.

मका आणला इंदापुरातून; १५ जणांचा रोजगारही गेला..गावातील एक शेतकरी मुरघास तयार करून विकतो. यासाठी तेथे १५ मजूर काम करायचे. जवळपास चारा नसल्याने मुरघास तयार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून मका विकत आणून मुरघास तयार केला; पण आता चाराच नाही. त्यामुळे मजुरांनाही काम राहिले नाही; तसेच जनावरांसाठी फलटणच्या कॅनाॅल भागातून ३८०० ते ४ हजार रुपये टनाने ऊस आणावा लागतोय. शेतकऱ्यांचा खर्च पाणी आणि जनावरांवरच होऊ लागला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी