शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सातारा जिल्ह्यातील गावात १४ टाक्यांचा थाट; पाण्याचा ठणठणाट!

By नितीन काळेल | Updated: May 21, 2024 19:29 IST

कंत्राटदारावर मेहेरबानी : सासवडमध्ये टँकरचे माणसी २० लिटर पाणी; शाैचाचे काय?

सातारा : फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) येथे वर्षापासून टँकर आहे. लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत आहे. त्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आलीय. त्यातच जादा टँकरही मिळाला नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तर गावात पाण्याच्या १४ टाक्या असल्या तरी ठणठणाट आहे. कंत्राटदारांवरील मेहेरबानीसाठीच योजना राबविल्याचा आरोपही होत आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सासवड गाव. लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. तर गावाला १४ जूनपासून टँकर सुरू झाला तो आजही बंद नाही. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातील अनेक टाक्यांत पाणीच कधी पडले नाही, असे ग्रामस्थच सांगतात. तर गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा होतो.भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजनाही आहेत; पण सध्यातरी याचा काहीच फायदा होत नाही. कालव्याला पाणी आले तरच पेयजल योजना सुरू राहते. गावात पाण्यासाठी आणखी एक टाकी बांधण्यात येत आहे; पण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी उद्भव स्त्रोतच माहीत नाही मग टाक्या आणि योजना करून काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच एवढ्या पाणी योजना आणि टाक्या म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदारांचीच मिलीभगत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करू लागलेत.

गावाला सध्या ५५ हजार लिटर पाणी मंजूर आहे. टँकरद्वारे माणसी २० लिटर, मोठ्या जनावरांना ३५ आणि लहान जनावरांना १० लिटर याप्रमाणे पुरवठा होतोय. हे पाणीही पुरेसे होत नाही. यासाठी गावाने एक लाख लिटर पाणी मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. यासाठी खासगी टँकरमधून पाणी घ्यायचे झाल्यास १२०० रुपयांना ५ हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातच गावात जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठीही विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.

चारा डेपोची मागणी धूळखात..सासवडमध्ये पाण्याचाच प्रश्न नाही, तर चाराटंचाईही तीव्र आहे. खरीप आणि रब्बी हंगामही आला नाही. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे. जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणीही केली; पण पुढे काहीच झाले नाही.

मका आणला इंदापुरातून; १५ जणांचा रोजगारही गेला..गावातील एक शेतकरी मुरघास तयार करून विकतो. यासाठी तेथे १५ मजूर काम करायचे. जवळपास चारा नसल्याने मुरघास तयार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून मका विकत आणून मुरघास तयार केला; पण आता चाराच नाही. त्यामुळे मजुरांनाही काम राहिले नाही; तसेच जनावरांसाठी फलटणच्या कॅनाॅल भागातून ३८०० ते ४ हजार रुपये टनाने ऊस आणावा लागतोय. शेतकऱ्यांचा खर्च पाणी आणि जनावरांवरच होऊ लागला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी