शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

‘किसान अ‍ॅप’चे वरातीमागून घोडे; चक्रीवादळ जाऊनही अलर्ट नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST

सातारा : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या किसान अ‍ॅपची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी ...

सातारा : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या किसान अ‍ॅपची असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. कारण, आता नुकतेच चक्रीवादळ येऊन गेले तरी त्याची माहिती मिळाली नाही. त्यातच अनेक शेतकऱ्यांकडे किसान अ‍ॅपही नाही. हवामान अंदाजासाठी अनेक शेतकरी खासगी संस्थांच्या अ‍ॅपवर अवलंबून आहेत.

जगातील प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि वादळ, वाऱ्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टळावे, या हेतूने विविध अ‍ॅप विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकीच हे एक किसान अ‍ॅप आहे. जिल्ह्यात अत्यंत मोजके शेतकरी या ‘किसान अ‍ॅप’चा वापर करतात. पण हे अ‍ॅप म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, अ‍ॅपवरून वेळेत संदेश मिळत नाहीत. गेल्या पंधरवड्यात तर तौक्ते वादळाचा संदेश आम्हाला आलाच नाही. संदेश आला असता तर विविध उपाययोजना करता येतात. काहीवेळा वादळ, पाऊस येऊन गेल्यावर संदेश येतो. त्यामुळे हे अ‍ॅप का वापरायचे, असा प्रश्न पडतो. वेळेत माहिती मिळाली तर वैरण, धान्य, जनावरे संरक्षित ठिकाणी ठेवता येतात. अनेकवेळा हवामानाची माहिती या ‘किसान अ‍ॅप’वर मिळतच नाही. त्यामुळे काही खासगी संस्थांच्या अ‍ॅपवरील संदेशावर विश्वास ठेवून उपाययोजना करण्यात येतात.

चौकट :

किसान अ‍ॅपवरून ही माहिती मिळते...

१. किसान अ‍ॅपवरून हवामान, वादळ, अवकाळी पाऊस, पीक पेरणी, विजांचा कडकडाट आदी माहिती मिळते.

२. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसह पीककर्ज, पीकविम्याच्या अनुषंगाने माहिती मिळते.

३. शेतीविषयक शासनाच्या योजना, अनुदाने, अर्ज करण्याची प्रक्रिया यांचीही माहिती मिळते.

४. जनावरांच्या आजाराच्या साथी, पिकांची मशागत, काढणी, पिकांवर पडणारे रोग व त्यावर औषधे यांचीही माहिती दिली जाते.

चौकट :

माहिती वेळेत मिळाली तरच फायदा...

- किसान अ‍ॅपवरून शेतीविषयक माहिती व सूचना वेळेत मिळाल्या तरच फायदा होतो.

- वादळी, पाऊस विजांचा कडकडाट यांची माहिती किमान काही तास अगोदर मिळाली तरच धान्यसाठे, जनावरांचे संरक्षण करता येते.

- पिकांवरील कीड, जनावरांचे आजार आदींची माहिती योग्यवेळी मिळाली तर औषधोपचार करता येतो. पिकांचा बचाव करणे शक्य होते.

चौकट :

अ‍ॅपवरून माहिती अनेकवेळा मिळतच नाही...

कोट :

किसान अ‍ॅप हे स्वतंत्र अ‍ॅप आम्ही वापरत नाही. काही खासगी संस्थांच्या अ‍ॅपचा वापर करतो. त्यावरून वेळेत मेसेज येतात. काही शेतकरी किसान अ‍ॅप वापरत होते. पण, त्यावरून सूचना योग्य वेळी मिळत नाहीत. वादळ, पाऊस संपल्यावर मेसेज येतात. यामुळे शेतकऱ्यांनी अ‍ॅप डिलीट केली आहेत. तौक्ते चक्रीवादळाचाही उशिरा मेसेज आला.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोट :

मागील १५ दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसाचे इशारे मिळाले. पण, तोपर्यंत पाऊस सुरु झालेला होता. किसान अ‍ॅपऐवजी आम्ही अन्य खासगी कंपन्यांच्या मेसेजवर विश्वास ठेवत आलो आहोत. त्याचा फायदाही शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे. त्यांच्याकडून काही तास अगोदर किंवा आदल्या दिवशी पूर्वकल्पना मिळते.

- राजाराम पाटील, शेतकरी

.........................

किसान अ‍ॅपचा काही दिवसच वापर केला. पण, अनुभव चांगला नव्हता. शिवाय फक्त अ‍ॅपवर विसंबून शेती करता येत नाही. सध्या दोन ते तीन अ‍ॅपवरून अंदाज घेत राहतो. त्यामुळे नुकसान टाळता येते. शासनाने शेतकऱ्यांसाठी हमखास भरवशाची माहिती देणारे संकेतस्थळ विकसित करायला हवे.

- शामराव पवार, शेतकरी

............................................

खासगी संस्थांच्या अ‍ॅपवरून आगाऊ माहिती...

मान्सूनच्या पावसाचे अंदमान बेटावर आगमन झाले आहे. त्यामुळे मान्सून पुढील वाटचाल करत आहे. पण, बंगालच्या उपसागरात एक वादळ तयार होऊन मान्सूनला अडथळा निर्माण करणार आहे. १४ जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊन पेरणीला सुरुवात होईल, अशी माहिती खासगी अ‍ॅपवरून येऊ लागली आहे. पण, किसान अ‍ॅपवर अजून संदेशच नाही. अशामुळे शेतकऱ्यांचा ओढा खासगी अ‍ॅपकडेच दिसून येत आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\