शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिवृष्टीचा दणका; सातारा जिल्ह्यात २०७ घरांना फटका

By नितीन काळेल | Updated: July 30, 2024 19:06 IST

सातारा, वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात नुकसान 

सातारा : जिल्ह्याला मे महिन्यात वळवाचा फटका बसल्यानंतर आताही अतिवृष्टीचाही दणका बसला आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे बळीराजाचेही नुकसान झाले आहे. सध्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. तसेच भूस्खलन होऊन गावांना धोका निर्माण होतो. आताही मागील आठवड्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच रस्ते खचले, भूस्खलन झाले. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. या अतिवृष्टीचा फटका पाटण, महाबळेश्वर, वाई, आणि सातारा तालुक्याला अधिक करुन बसला.

पावसात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. त्यातच अजुनही पश्चिमेकडे पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आणखी नुकसान होण्याचा अंदाज आहे. सध्यातरी जिल्ह्यात अतिवृष्टीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पंचनाम्यानंतरच अधिकृत नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.मागील आठवड्यातील अतिवृष्टीत पश्चिम भागातील २०७ घरांना फटका बसला. यामध्ये पाटण तालुक्यातच अधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात १३५ घरांना दणका बसला. तर सातारा तालुक्यात ४९ घरांचे नुकसान झाले. वाई तालुक्यात १४ तर महाबळेश्वर तालुक्यातही ९ घरांना फटका बसलेला आहे. त्याचबरोबर काही भागात शेतीचेही नुकसान झाले आहे. त्याबाबत अजून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व पंचनामे झाल्यानंतरच अतिवृष्टीतील नुकसानीचा आकडा समोर येणार आहे.सातारा, पाटणमध्ये जनावरे मृत..अतिवृष्टीचा फटका माणसांना बसला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही नुकसानीस सामोरे जावे लागले. कारण, पावसामुळे लहान आणि मोठ्या मिळून १३ जनांवरांचा मृत्यू झाला. सातारा आणि पाटण तालुक्यातच जनावरे दगावली. निकषानुसार जनावरांच्या मृत्युसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.

अवकाळी व वळीव पावसात १५६ घरे, गोठा शेडचे नुकसान..जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्यादरम्यान अवकाळी व वळवाचा पाऊस झाला होता. त्यावेळी पावसाबरोबर जोरदारे वारे वाहत होते. तसेच वीजाही पडल्या. यामध्ये १५६ घरे, गोठा आणि शेडचे नुकसान झाले होते. ४ शाळा, प्रत्येकी एक वाहन आणि पोल्ट्री शेडलाही फटका बसलेला. तसेच पाऊस आणि वीजा पडून १२ मोठी जनावरे, सुमारे ४० लहान पशुधन आणि १० कोंबड्याही मृत झालेल्या. तर वीज अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस