शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

By दीपक शिंदे | Updated: April 25, 2024 12:00 IST

साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली

दीपक शिंदेसातारा : स्वातंत्र्य चळवळीत काम केलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या साताऱ्यातील अनेक धुरंधरांनी या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र, अनेक वर्षे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था सध्या अगदीच बिकट झाली आहे. काही झाले तरी पक्षाशी असलेली बांधिलकी सोडणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याने मित्रपक्षाने जागा देऊ केल्यानंतरही ती स्वाभिमानाने स्वीकारली नाही. पण, यामुळे आता मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून १९६२ पासून ते १९९८ पर्यंत केवळ १९९६ सालचा अपवाद वगळता काँग्रेसचा खासदार होता. यशवंतराव चव्हाण हे चार वेळा, प्रतापराव भोसले तीन वेळा आणि किसन वीर, अभयसिंहराजे भोसले हे या मतदारसंघातून एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे जिल्ह्यात काँग्रेसकडेच सत्ता होती. प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करावी लागत होती. अनेक विकासकामे या काळातही झाली. सैनिक स्कूल, कऱ्हाड मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, साखर कारखानदारी यामुळे या भागाचा विकास होण्यास मदतच झाली.

१९५२- सातारा आणि सांगली असे दोन जिल्हे एकत्र असलेल्या या मतदारसंघात दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण सातारा संबोधल्या जाणाऱ्या सातारा परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे व्ही. पी. पवार हे विजयी झाले होते.१९५७ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी जे. एस. आळतेकर यांचा पराभव करून पहिल्यांदा साताऱ्यात कम्युनिस्टांचा झेंडा रोवला.१९६२ - काँग्रेसकडून लढत असताना किसन वीर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.१९६७ - किसन वीर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. तेव्हापासून सलग चार वेळा १९७१, १९७७ आणि १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.१९८४ पासून काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांनी तीनवेळा १९८९, १९९१ पर्यंत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.१९९६ मध्ये उदयनराजे भोसले यांनी अपक्ष म्हणून लढताना १ लाख १३ हजार मते घेतल्यामुळे शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.१९९८ मध्ये अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतला.१९९९ - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी सलग दोन वेळा २००४ पर्यंत तर उदयनराजे भोसले यांनी तीन वेळा २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

काँग्रेस अशी अवस्था का झाली?

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत गेले.
  • काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेते यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव कमी झाला.
  • केंद्रीय नेतृत्व दिल्लीत अडकून पडले. तर राज्यात शिवसेना - भाजपचे सरकार आल्यानंतर तसेच त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना जुळवून घेताना अडचणी निर्माण झाल्या.
  • महाआघाडीच्या निमित्ताने काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा एकूणच प्रभाव कमी झाला.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस