शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

By दीपक शिंदे | Updated: April 25, 2024 12:00 IST

साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली

दीपक शिंदेसातारा : स्वातंत्र्य चळवळीत काम केलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या साताऱ्यातील अनेक धुरंधरांनी या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र, अनेक वर्षे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था सध्या अगदीच बिकट झाली आहे. काही झाले तरी पक्षाशी असलेली बांधिलकी सोडणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याने मित्रपक्षाने जागा देऊ केल्यानंतरही ती स्वाभिमानाने स्वीकारली नाही. पण, यामुळे आता मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून १९६२ पासून ते १९९८ पर्यंत केवळ १९९६ सालचा अपवाद वगळता काँग्रेसचा खासदार होता. यशवंतराव चव्हाण हे चार वेळा, प्रतापराव भोसले तीन वेळा आणि किसन वीर, अभयसिंहराजे भोसले हे या मतदारसंघातून एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे जिल्ह्यात काँग्रेसकडेच सत्ता होती. प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करावी लागत होती. अनेक विकासकामे या काळातही झाली. सैनिक स्कूल, कऱ्हाड मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, साखर कारखानदारी यामुळे या भागाचा विकास होण्यास मदतच झाली.

१९५२- सातारा आणि सांगली असे दोन जिल्हे एकत्र असलेल्या या मतदारसंघात दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण सातारा संबोधल्या जाणाऱ्या सातारा परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे व्ही. पी. पवार हे विजयी झाले होते.१९५७ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी जे. एस. आळतेकर यांचा पराभव करून पहिल्यांदा साताऱ्यात कम्युनिस्टांचा झेंडा रोवला.१९६२ - काँग्रेसकडून लढत असताना किसन वीर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.१९६७ - किसन वीर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. तेव्हापासून सलग चार वेळा १९७१, १९७७ आणि १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.१९८४ पासून काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांनी तीनवेळा १९८९, १९९१ पर्यंत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.१९९६ मध्ये उदयनराजे भोसले यांनी अपक्ष म्हणून लढताना १ लाख १३ हजार मते घेतल्यामुळे शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.१९९८ मध्ये अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतला.१९९९ - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी सलग दोन वेळा २००४ पर्यंत तर उदयनराजे भोसले यांनी तीन वेळा २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

काँग्रेस अशी अवस्था का झाली?

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत गेले.
  • काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेते यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव कमी झाला.
  • केंद्रीय नेतृत्व दिल्लीत अडकून पडले. तर राज्यात शिवसेना - भाजपचे सरकार आल्यानंतर तसेच त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना जुळवून घेताना अडचणी निर्माण झाल्या.
  • महाआघाडीच्या निमित्ताने काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा एकूणच प्रभाव कमी झाला.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस