शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

By दीपक शिंदे | Updated: April 25, 2024 12:00 IST

साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली

दीपक शिंदेसातारा : स्वातंत्र्य चळवळीत काम केलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष वाढविणाऱ्या साताऱ्यातील अनेक धुरंधरांनी या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र, अनेक वर्षे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था सध्या अगदीच बिकट झाली आहे. काही झाले तरी पक्षाशी असलेली बांधिलकी सोडणार नाही अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याने मित्रपक्षाने जागा देऊ केल्यानंतरही ती स्वाभिमानाने स्वीकारली नाही. पण, यामुळे आता मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून १९६२ पासून ते १९९८ पर्यंत केवळ १९९६ सालचा अपवाद वगळता काँग्रेसचा खासदार होता. यशवंतराव चव्हाण हे चार वेळा, प्रतापराव भोसले तीन वेळा आणि किसन वीर, अभयसिंहराजे भोसले हे या मतदारसंघातून एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे जिल्ह्यात काँग्रेसकडेच सत्ता होती. प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करावी लागत होती. अनेक विकासकामे या काळातही झाली. सैनिक स्कूल, कऱ्हाड मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, साखर कारखानदारी यामुळे या भागाचा विकास होण्यास मदतच झाली.

१९५२- सातारा आणि सांगली असे दोन जिल्हे एकत्र असलेल्या या मतदारसंघात दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण सातारा संबोधल्या जाणाऱ्या सातारा परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे व्ही. पी. पवार हे विजयी झाले होते.१९५७ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी जे. एस. आळतेकर यांचा पराभव करून पहिल्यांदा साताऱ्यात कम्युनिस्टांचा झेंडा रोवला.१९६२ - काँग्रेसकडून लढत असताना किसन वीर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.१९६७ - किसन वीर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. तेव्हापासून सलग चार वेळा १९७१, १९७७ आणि १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.१९८४ पासून काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांनी तीनवेळा १९८९, १९९१ पर्यंत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.१९९६ मध्ये उदयनराजे भोसले यांनी अपक्ष म्हणून लढताना १ लाख १३ हजार मते घेतल्यामुळे शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा विजय झाला.१९९८ मध्ये अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतला.१९९९ - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी सलग दोन वेळा २००४ पर्यंत तर उदयनराजे भोसले यांनी तीन वेळा २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या श्रीनिवास पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

काँग्रेस अशी अवस्था का झाली?

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत गेले.
  • काँग्रेसचे नेतृत्व करणारे नेते यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव कमी झाला.
  • केंद्रीय नेतृत्व दिल्लीत अडकून पडले. तर राज्यात शिवसेना - भाजपचे सरकार आल्यानंतर तसेच त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना जुळवून घेताना अडचणी निर्माण झाल्या.
  • महाआघाडीच्या निमित्ताने काही जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा एकूणच प्रभाव कमी झाला.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस