शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

हमीभाव देण्याचा प्रयोग यशस्वी - विक्रम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 6:46 PM

शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सातारा बाजार समिती निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ उठवणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या पाल्यांनाही आम्ही लाभ देत आहोत. - विक्रम पवार, सभापती सातारा बाजार समिती

ठळक मुद्दे शेतकरी हितासाठी बाजार समितीकडून अनेक निर्णय

सागर गुजर।सातारा : ग्रामीण भागात शेतकरी कष्टाने पीक काढतात. शेतात अनेक प्रयोगही केले जातात. हे प्रयोग यशस्वी होत असताना बाजार समितीच्या माध्यमातून त्यांना पाठबळ दिले गेले तर शेतकरी अधिक जोमाने काम करतील. सातारा बाजार समितीने अनेक उपक्रम राबवून शेतकºयांच्या हिताचे काम हाती घेतलेले आहे. शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे इतर बाजार समित्यांसाठी हे काम आदर्शवत ठरले आहे.

प्रश्न : शेतकºयांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी काय निर्णय घेतले?उत्तर : शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी सर्व व्यापाºयांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बाजारपेठेची माहिती मिळावी, यासाठी शेतकºयांच्या मोबाईलवर बाजारभाव पाठविले जातात. गुरुवार व रविवारी तब्बल ८०० शेतकºयांना बाजारभावाची माहिती मोबाईलवर पाठविली जाते.

प्रश्न : शेतकºयांच्या मुलांसाठी अभ्यासिकेला कसे मूर्तरूप दिले?उत्तर : सातारा तालुक्याच्या डोंगरदºयांतील गावांमधून शेकडो मुले शिक्षण घेण्यासाठी साताºयातील महाविद्यालयांमध्ये येतात. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठीही विविध ठिकाणी अभ्यासिकेत जातात. या मुलांना जर मोफत अभ्यासिका उपलब्ध केली तर शेतकºयांचा आर्थिक ताण कमी होईल, या हेतूने बाजार समितीच्या आवारात मोफत अभ्यासिका उभारण्यात आली.

प्रश्न : शेतकरी मंडईतील चिखलाचे साम्राज्य कसे दूर केले?उत्तर : बाजार समितीच्या आवारात शेतीमाल विक्रीसाठी शेतकºयांना जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. पावसाळ्यामध्ये या आवारात चिखलाचे साम्राज्य साठायचे. बाजार समितीने या जागेत साडेआठ लाख रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक टाकले. यामुळे चिखलाचे साम्राज्य दूर झाले.

प्रश्न : पाच रुपयांत जेवणाचा उपक्रम काय आहे?उत्तर : शेतकरी सकाळी शेतमाल घेऊन यतात. त्यामुळे बाजार समितीतर्फे शेतकºयांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. बाजार समिती व आडत व्यापाºयांनी यासाठी योगदान दिले आहे. 

  • अभ्यासिकेचा प्रयोग यशस्वी

खेडोपाड्यातून असंख्य युवक-युवती महाविद्यालयीन शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सातारा शहरात येत असतात. सातारा व जावळी तालुक्यांचा बहुतांश भाग हा डोंगरी आहे. सकाळी ६ वाजता एखादी एसटी बस सातारा शहरात आली तर संध्याकाळीच दुसरी बस मिळते. त्यामुळे मधल्या काळात मुले पैसे देऊन अभ्यासिकेत बसतात. या मुलांचे पैसे वाया जात होते. बाजार समितीतर्फे या मुलांसाठी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली. त्या अभ्यासिकेला यशही आले. या अभ्यासिकेत अभ्यास केलेले तरुण-तरुणी नोकरीला लागले. साकेवाडी, जकातवाडी या गावांतील एकूण ४ बेरोजगारांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली.

  • अन् शेतक-यांच्या चो-या थांबवल्या

पोवई नाका ते सुभाषचंद्र चौक या रस्त्यावर पहाटे ४ पासून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. या भागात टॉयलेट उपलब्ध नाही. त्यामुळे शेतमाल रस्त्यावर सोडून शेतकरी टॉयलेटकडे जात होते. मात्र शेतकरी शेतमाल चोरून नेत असत. बाजार समितीने बीओटी तत्त्वावर टॉयलेट उभारले. शेतकºयांना ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी