शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:56 IST

आया-बहिणींना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी

सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी श्रेयवाद सुरू आहे. त्यामुळे बहिणींनाच प्रश्न पडलाय की नेमकं कोठे जायचं. तिला माहीत आहे की, सख्खा भाऊ सत्तेत नसल्यामुळे यांच्याशी गोड बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. खरं तर आज एकही बहीण सुरक्षित नाही. आया-बहिणींना सुरक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे ही लाडकी बहीणच सरकारला जागा दाखवेल, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.सातारा जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर शाहू कला मंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बाेलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर सरकार शरण आल्यासारखे करत आहे. त्यांच्याकडून काही हवं असेल तर हीच वेळ आहे. परंतु, फक्त घोषणा मिळतील. सरकारने मोठ्या घोषणा केल्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर झाला आहे. २ लाख ३० हजार कोटी इतकी प्रचंड राजकोषीय तूट आहे. केलेल्या घोषणा व दिलेली कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सर्व फाइल्सवर महसूल व वित्त विभाग निधी नसल्याचे लिहीत आहे.तरीही अर्थमंत्र्यांचे न ऐकता, उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री धडाधड योजना जाहीर करत आहेत. परंतु, बाणेदारपणा दाखवण्याऐवजी दोन्ही उपमुख्यमंत्री खुर्ची लाडकी असल्याने सोडायला तयार नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस राजकुमार पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटलांसारखा अनुभव साताऱ्यात येईनाहर्षवर्धन पाटील यांना जो अनुभव इंदापूरला आला, त्यामुळे त्यांनी भाजप पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्यांच्यासारखा अनुभव अजून सातारकरांना येईना झालाय. तथापि, हळूहळू राज्यातील आणखी नेते खा. शरद पवार यांच्यासोबत दिसतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीWomenमहिला