शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कांद्यामुळे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : जिल्ह्यात कांद्याची आवक कमी असून सातारा बाजार समितीत तर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांना अच्छे ...

सातारा : जिल्ह्यात कांद्याची आवक कमी असून सातारा बाजार समितीत तर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन येऊ लागले आहेत. तर भेंडी अन् शेवग्याचाही भाव तेजीत आहे. मात्र, कोबी, टोमॅटो व फ्लॉवरला दर कमीच मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो.

सातारा बाजार समितीत बुधवारी कांद्याला क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत गेला. तर हलक्या प्रतिच्या कांद्याला २ हजारापर्यंत भाव आला. यामुळे कांदा महाग होऊ लागल्याचे दिसत आहे. साताऱ्यातील मंडई तसेच दुकानातही कांदा विक्रीचा दर ६० रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. यामुळे सामान्यांच्या खर्चात वाढच झाली आहे.

सातारा बाजार समितीत बुधवारी ५५ वाहनांतून ३७८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची २४७ क्विंटलची आवक झाली. तर बटाटा ४१, लसूण १६ आणि आल्याची ९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली. बाजार समितीत गवारला १० किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवगा शेंगेला ४०० ते ५०० रुपये भाव आला. शेवगा शेंगेच्या दरात वाढ झाली आहे. तर वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ५० ते ७०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० अन् दोडक्याला ३०० ते ४०० रुपये दर आला.

बटाट्याला क्विंटलला ७०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांदरम्यान दर मिळाला. लसणाला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.

चौकट :

पालेभाज्यांची आवक जेमतेम...

सातारा बाजार समितीत बुधवारी पालेभाज्यांची आवक जेमतेम झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात चढ-उतार होता. मेथीच्या १३०० पेंड्यांची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १२०० पेंडी आली. याला शेकडा दर ४०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये भाव आला.

......................................................