शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावावरील कचरा ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ ओळखल्या जाणाऱ्या कास तलावावर सर्रास पार्ट्या होऊन अर्धवट, खरखटे अन्न चिकटून ठिकठिकाणी ...

पेट्री : शहराच्या पश्चिमेस जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ ओळखल्या जाणाऱ्या कास तलावावर सर्रास पार्ट्या होऊन अर्धवट, खरखटे अन्न चिकटून ठिकठिकाणी पडलेले प्लॅस्टिक, कागद, थर्माकॉल डिशेस, ग्लास मुक्या जनावरांकडून चघळून खाल्ले जात असल्याने हा कचरा मुक्या जनावरांना जीवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचवणारा हा कचरा पूर्णत: थांबला जावा, यासाठी या परिसरात जनजागृतीपर माहिती फलक लावले जावेत तसेच होणाऱ्या पार्ट्यावर अटकाव येण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे.

कास तलाव या पर्यटनस्थळी पर्यटकांची दिवसेंदिवस वर्दळ वाढत असून, ओल्या-सुक्या पार्ट्या होत आहेत. प्लास्टिक ग्लास, बाटल्या, पिशव्या, कागदी ग्लास, प्लेटा, कुरकुरे, वेफर्स स्नॅक्सची पाकिटे मोठ्या प्रमाणावर इतरत्र पडलेले दिसत आहेत. परिसरातील मुक्या जनावरांकडून अन्न म्हणून हा कचरा खाल्ला जात असल्याने पोटात तसाच राहतो. साधारण २० ते २५ किलोपर्यंत हा कचरा पोटात साठल्याने जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे असे दुष्परिणाम घडून त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. तलावाचा संपूर्ण परिसर दाट झाडी जंगलाचा असल्याने या परिसरातील रानगवा, भेकरं, रानडुक्कर, बिबट्या आदींसारखे अनेकविध पाण्यावर येणारे वन्यजीव खरखटे व उष्ट अन्न खाण्याच्या हेतूने प्लॅस्टिक कचरा खाण्याचा संभव अधिक आहे. अविघटनशील कचऱ्याने मुक्या जनावरांच्या जीवितास धोका उद्भवण्याचा संभव अधिक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पार्ट्या करणाऱ्यांकडून हा कचरा होऊ नये. तसेच होणारा कचरा इतरत्र टाकू न देता तो आपल्यासमवेत घरी माघारी नेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जावी असे बोलले जात आहे. मुक्या जनावरांच्या जिवावर बेतेल असे कोणतेही विघातक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

(कोट )

कास तलाव पर्यटनस्थळी पार्ट्या झोडून पर्यटकांकडून होत असलेला कचरा मुक्या जनावरांकडून चघळला जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊन मृत्युचाही संभव आहे. यामुळे परिसरात कसलाही कचरा होणार नाही याची दक्षता प्रत्येक पर्यटकाने घेणे गरजेचे आहे.

-डॉ. योगेश माळी, पशुवैद्यकीय अधिकारी, गांजे, ता. जावली

(कोट)

मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत असलेल्या कास तलाव परिसरात वन्यजिवांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, तलाव परिसरात ठिकठिकाणी तलावाच्या काठी तसेच झाडाझुडपात होणारा प्लॅस्टिक, कागदांचा कचरा वन्यजिवांना धोका निर्माण करणारा असल्याने या परिसरात कचरा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.

-प्रशांतकुमार पडवळ, वनपाल

फोटो आहे..

25कास

कास तलावावर प्लॅस्टिक कचरा मुक्या जनावरांना जीवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.