शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

साताऱ्यात नगराध्यक्षांची गांधीगिरी

By admin | Updated: February 5, 2016 00:58 IST

काटकसरीचे आवाहन : पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दिले गुलाबपुष्प

सातारा : शहरात सध्या पाणीटंचाई सुरू असताना काहीजण पाण्याचा अपव्यय करतात, अशा लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी गुरुवारपासून गांधीगिरी सुरू केली आहे. पहाटे उठून पाण्याची नासाडी करणाऱ्यांना ते गुलाबपुष्प देत आहेत. ‘आता तरी यापुढे पाणी काटसरीने वापरा,’ असा संदेश ते नागरिकांना देत आहेत. कासची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली असताना शहरात मात्र पाण्याची नासाडी होत आहे. अनेकवेळा नागरिकांना आवाहन करूनही त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबवा, हे सांगण्यासाठी नगराध्यक्षांनी गांधीगिरी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी सात ते नऊ यावेळेत नगराध्यक्ष विजय बडेकर, पाणीपुरवठा सभापती लीना गोरे आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात फेरफटका मारला. रस्त्यावर सडा मारणारे नागरिक, नळांना तोट्या न बसविल्यामुळे पाणी वाया घालविणारे नागरिक, रस्त्यावर पिण्याचे पाण्याने वाहने धुणारे नागरिक नगराध्यक्षांना आढळून आले. अशा लोकांना नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी गुलाबपुष्प दिले. न्यू इंग्लिश स्कूल चौक ते दत्तमंदिर चौक , सोमवार पेठ, पाचशे एक पाटी ते मोती चौक, पाचशे एक पाटी ते बारटक्के चौक, फुटका तलाव, सोन्या मारुती चौक परिसर या भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. महिला आणि पुरुषही यावेळी पाण्याचा अपव्यय करताना आढळून आले. यावेळी पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर चव्हाण, पाणीपुरवठा लिपिक संदीप सावंत तसेच या प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)