शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

संसदेत मराठीतून भाषण करणारा पहिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:23 IST

दीपक शिंदे सा तारा लोकसभा मतदार संघातून १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत गणेश आळतेकर यांनी सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे ...

दीपक शिंदेसा तारा लोकसभा मतदार संघातून १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत गणेश आळतेकर यांनी सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तर १९५७ च्या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा उत्तर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते.क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जनसामान्यांवर चांगला पगडा होता. सातारा आणि सांगली भागात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा अधिक प्रभाव होता. इंग्रज सरकारला आपले स्थानिक प्रश्न कळणार नाहीत, त्यासाठी आपले सरकार पाहिजे, असे त्यांचे मत होते. केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत:चे प्रतिसरकार स्थापन केले. गावागावात होणारे तंटे आणि टग्यांचे वाढलेले प्रस्थ नाना पाटील यांनी मोडून काढले. कोणावरही अन्याय होता कामा नये आणि कोणाचाही गैरफायदा घेता कामा नये, यासाठी त्यांनी कटाक्षाने लक्ष घातले.नाना पाटील हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथील. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेले नाना पाटील पाहताक्षणीच अनेकांच्या मनात धडकी भरत होती. त्याबरोबरच त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे अनेकजण त्यांच्याकडे आकर्षितही होत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ तलाठ्याची नोकरी केली; पण १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली आणि या चळवळीकडे ते आकर्षित झाले. त्यामुळे तलाठ्याची नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढा आणि बहुजन सामाजाचा विकास अशा दोन्ही मार्गांनी काम चालू ठेवले.नानांवर वारकरी सांप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळे प्रभावी भाषेत भाषण करून लोकांना आपल्याकडे ओढण्याची कला त्यांच्याकडे होती. लोकांच्या भाषेत आणि ग्रामीण ढंगात होणारी त्यांची भाषणे ऐकण्यासाठीही लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असत. बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान होते. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे, यासाठी ‘आपुला आपण करू कारभार’ असे सूत्र ठेवून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली होती.प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, सावकारी मोडून काढणे, बाजारांची व्यवस्था करणे, महिलांवरील अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करणे आणि गावगुंडांचा बदोबस्त करणे ही कामे त्यांनी पहिल्या टप्प्यात हातात घेतली होती. लोकांसाठी काम करणारा नेता म्हणून नाना पाटील यांची ओळख होती. त्यामुळे मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे होता.