शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:07 PM

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा,

ठळक मुद्देशहाजी भोईटे : कोरेगावातील मुख्य बाजार आवारात खरेदीला सुरुवात

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगावातील मुख्य बाजारात सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन शहाजी भोईटे यांनी केले आहे.शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम २०१७-१८ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन सहकारी संस्था सहायक निबंधक संजय सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, बाजार समीतीचे सभापती प्रतापराव कुमुकले, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे देसाई तसेच बाजार समिती खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचे कृषी सहकार व पणन विभागामार्फ त रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त हरभरा उत्पन्न अपेक्षित होते, त्यामुळे ज्यादा आवक ज्याल्याने बाजार भाव किमान अधारभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, अशाप्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रतिक्विंटल ४४०० रुपये दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहेत.

यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करता हरभरा या पीक पाण्याच्या नोंदीसह सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान, शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्र्रता कमाल १४ टक्के असावी, तो कडीकचरा किंवा मातीमिश्रित नसावा, असे अवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.सोयाबीन विक्रीला प्रतिसादयापूर्वी देखील खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ६१८२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळण्याच्या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन,कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय