शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

Satara News: कास मार्गावरील गणेशखिंड पुन्हा वणव्यात होरपळला!, तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:29 IST

परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे

पेट्री : कास मार्गावर गणेशखिंड परिसरात अज्ञातांकडून शनिवारी रात्री वणवा लागला. यामुळे गणेशखिंड परिसर पुन्हा वणव्यात होरपळूण निघाला होता. लागलेला वणवा विझविण्यासाठी कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या डहाळ्यांच्या साहाय्याने रात्री आठ ते पावणेअकरा अशी तब्बल तीन तास आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर त्यांना वणवा पूर्णपणे विझविण्यात यश आले. वनसंपदेचे, प्राणीसंपदेचे मोठ्या स्वरूपात होणारे संभाव्य नुकसान टळले.गणेशखिंड परिसरात शनिवारी रात्री वणवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली होती. प्राणी संपदेलाही या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे. कित्येक पशूपक्ष्यांचे निवारे नष्ट होऊन शेकडो टन चारा आगीत खाक होत आहे. बहरण्यापूर्वीच कित्येक वृक्ष वणव्यात होरपळले जात आहेत. परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या परिसरात वारंवार वणव्यांच्या घटनेने निसर्गाचे सौंदर्य लोप पावत चालले आहे. पर्यावरणाला धोका पोहोचलेला असताना अद्यापही अज्ञातांकडून वणवा लावण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत.कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून अज्ञातांकडून लागलेल्या वणव्याची आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. वणवा विझविण्यासाठी अभिषेक शेलार, विठ्ठल कदम, सीताराम बादापुरे, विजय बादापुरे, चंदर कदम आदी कर्मचारी होते. पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून झाडाच्या डहाळ्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन केले आहे. जीव मुठीत धरून वनसमितीचे कर्मचारी वणवा विझवितात. दरम्यान, सर्पदंश अथवा एखाद्या अपघातासंदर्भात विमा संरक्षण महत्त्वाचे असल्याची माहिती समितीच्या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

..तर विकासापासून कोसो दूर जाऊगणेशखिंड परिसरात शनिवारी विघ्नसंतुष्टांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण केले. हळूहळू संपूर्ण डोंगर परिसरात आग पसरली. धुराचे लोट वाहत होते. कित्येक झाडेदेखील होरपळली. अशा विदारक घटनांमुळे आम्हाला जगू देताय की नाही?, असे मनोगत व्यक्त करणाऱ्या झाडांच्या भावना ओळखून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनीच घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पर्यावरणाच्या विकासाबाबत आपण कोसो दूर जाऊ, अशी शक्यता पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.

वणव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. कित्येक झाडे आगीत नष्ट होऊन वातावरणात तापमानाचे प्रमाण वाढत आहे. भूजल पातळीही अत्यल्प होत चालली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होत आहे. कित्येकजण रानमेवा विकून उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करतात. वणवे लागत असल्याने रानमेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वणवा लागणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊन पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करावे हे आपले कर्तव्य आहे. - अभिषेक शेलार, कर्मचारी, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारfireआग