शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Satara News: कास मार्गावरील गणेशखिंड पुन्हा वणव्यात होरपळला!, तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:29 IST

परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे

पेट्री : कास मार्गावर गणेशखिंड परिसरात अज्ञातांकडून शनिवारी रात्री वणवा लागला. यामुळे गणेशखिंड परिसर पुन्हा वणव्यात होरपळूण निघाला होता. लागलेला वणवा विझविण्यासाठी कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या डहाळ्यांच्या साहाय्याने रात्री आठ ते पावणेअकरा अशी तब्बल तीन तास आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर त्यांना वणवा पूर्णपणे विझविण्यात यश आले. वनसंपदेचे, प्राणीसंपदेचे मोठ्या स्वरूपात होणारे संभाव्य नुकसान टळले.गणेशखिंड परिसरात शनिवारी रात्री वणवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली होती. प्राणी संपदेलाही या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे. कित्येक पशूपक्ष्यांचे निवारे नष्ट होऊन शेकडो टन चारा आगीत खाक होत आहे. बहरण्यापूर्वीच कित्येक वृक्ष वणव्यात होरपळले जात आहेत. परिसरात विदारक असे भकास चित्र पाहावयास मिळत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या परिसरात वारंवार वणव्यांच्या घटनेने निसर्गाचे सौंदर्य लोप पावत चालले आहे. पर्यावरणाला धोका पोहोचलेला असताना अद्यापही अज्ञातांकडून वणवा लावण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत.कास पठार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून अज्ञातांकडून लागलेल्या वणव्याची आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. वणवा विझविण्यासाठी अभिषेक शेलार, विठ्ठल कदम, सीताराम बादापुरे, विजय बादापुरे, चंदर कदम आदी कर्मचारी होते. पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून झाडाच्या डहाळ्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन केले आहे. जीव मुठीत धरून वनसमितीचे कर्मचारी वणवा विझवितात. दरम्यान, सर्पदंश अथवा एखाद्या अपघातासंदर्भात विमा संरक्षण महत्त्वाचे असल्याची माहिती समितीच्या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

..तर विकासापासून कोसो दूर जाऊगणेशखिंड परिसरात शनिवारी विघ्नसंतुष्टांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण केले. हळूहळू संपूर्ण डोंगर परिसरात आग पसरली. धुराचे लोट वाहत होते. कित्येक झाडेदेखील होरपळली. अशा विदारक घटनांमुळे आम्हाला जगू देताय की नाही?, असे मनोगत व्यक्त करणाऱ्या झाडांच्या भावना ओळखून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनीच घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पर्यावरणाच्या विकासाबाबत आपण कोसो दूर जाऊ, अशी शक्यता पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.

वणव्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. कित्येक झाडे आगीत नष्ट होऊन वातावरणात तापमानाचे प्रमाण वाढत आहे. भूजल पातळीही अत्यल्प होत चालली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होत आहे. कित्येकजण रानमेवा विकून उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करतात. वणवे लागत असल्याने रानमेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे. वणवा लागणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊन पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करावे हे आपले कर्तव्य आहे. - अभिषेक शेलार, कर्मचारी, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारfireआग