शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

ट्रोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून वेण्णा धरणाची गळती शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:44 IST

खडकवासला (पुणे) येथील केंद्र्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र्रीय जल, विद्युत संशोधन संस्थेच्या पथकाकडून पाहणीकेमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करण्याबाबत अहवाल सादरकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम

सातारा ,दि.  ०६ :  खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी दिली आहे.

महाबळेश्वर शहरास १९९२ पासून नगर परिषदेमार्फ त वेण्णा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासाठी वेण्णा धरणातून होत असलेला पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचे निदर्शनास आल्याने १९८५ मध्ये धरणाचा पाणीसाठा वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार अधीक्षक अभियंता, परिसर अभियांत्रिकी मंडळ, सांगली या पाटबंधारे कार्यालयामार्फ त ५६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या धरणाचे नियोजन करण्यात आले.

या धरणाच्या कामास पाटबंधारे यंत्रणेमार्फ त १९९४ पासून सुरुवात करण्यात आली व जून २००७ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. सध्या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजेच ५६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा वापर महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरांना होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाला धोका निर्माण झाल्याने नुकतीच खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी