शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

उपोषण बारामतीत;अस्वस्थता साताऱ्यात

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

धनगर समाज आंदोलन : मंत्रालयातील बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ

खंडाळा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी लाखो समाजबांधव भर पावसातही बारामतीत तळ ठोकून आहेत. कित्येक दशकांचा अन्याय विधानसभेच्या तोंडावर आग ओकू लागला आहे. यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्रालयात सर्व मंत्र्यांच्या भेटी आणि चर्चा यामुळे धनगर समाजाच्या या आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. ‘आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळविणारच,’ असा दृढनिश्चय करून महाराष्ट्रातून एकवटलेल्या धनगर समाजाने योग्य निर्णय न झाल्यास आघाडी सरकारचेच ग्रह फिरविण्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या आंदोलनात खंडाळा तालुक्यातील शेकडो तर जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला आहे. आरक्षणाच्या मागणीचा पहिला आवाज हा खंडाळा तालुक्यातील तहसील कचेरीवर काढलेल्या मोर्चापासून झाला. बारामतीच्या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता हे आंदोलनकर्ते आरक्षणाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षभेद आणि संघटना विसरून केवळ समाजावर आजतागायत झालेल्या अन्यायाला वाचा फोडून अवघा समाज एकवटल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून या समाजाचे नेतृत्व करणारे शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे, खंडाळा पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील, कऱ्हाडचे रमेश लवटे यांनी गुरुवारी रामराजे नाईक-निंबाळकर आणि बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची मंत्रालयात भेट घेऊन आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यामुळे एकीकडे तीव्र आंदोलन तर दुसरीकडे मंत्र्यांच्या गाठीभेटी असे दुहेरी दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यावेळी योग्य निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत शासनाविरोधी मतदान करण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे सरकार आदिवासींची आरक्षण टक्केवारी अबाधित ठेवून सवलती जाहीर करणार की, आहे त्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषण जरी बारामतीत असले तरीही सातारा जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जमातीचे आरक्षण हा धनगर समाजाचा न्याय हक्क आहे. गेली साठ वर्षे आमच्यावर अन्याय झाला आहे. आजपर्यंत शांत बसलेला हा समाज जागृत झाला आहे. केवळ शब्दांच्या खेळात सवलतींपासून समाजाला दूर राहावे लागले आहे. त्यामुळे काही झाले तरी आरक्षण आम्ही मिळवूच. त्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.- रमेश धायगुडे-पाटीलसदस्य जिल्हा नियोजन मंडळभारतीय घटनेत धनगर समाजाला एसटीच्या सवलती दिल्या आहेत. केवळ राज्य शासनाने त्या लागू केल्या नाहीत. आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीररीत्या कोणतीही अडचण वाटत नाही. त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईल, तसे न झाल्यास समाजाच्या वतीने सुप्रिम कोर्टात लढण्याची सर्वांचीच मानसिकता आहे. समाजाला न्याय मिळण्याची हीच योग्य वेळ आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे