शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने ...

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने नेला नसल्याने ऊसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. ऊसाला तुरा फुटल्याने वजनात घट होऊन उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अहोरात्र कष्ट करूनही पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.

वाई तालुका ऊस, आले, हळद व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर तालुक्यांच्या मानाने तालुका सधन मानला जातो. किसनवीर साखर कारखाना याच तालुक्यात असल्याने शेतकरी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असतात. या तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. अतिवृष्टीमुळे यावर्षी ऊसाच्या पिकाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून, बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेऊन जावा, अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्षाच्या तयारीत आहे.

खरीप हंगामातील ऊस, हळद सोडून सर्व पिके वाया गेल्याने बळीराजाची सर्व भिस्त सध्या ऊसावर आहे. त्यालाच तुरे फुटल्याने ऊसाचे वजन कमी भरून पोकळ बांबू तयार झाला आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारी पिकाने ओढ दिल्यास शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊसावरच अवलंबून राहतो. तुरे आल्याने जनावरांचा चाराही धोक्यात आल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. तरीही शेतकरी हा खोट्या आशेवर जगत असून, ऊसावर मोठी भिस्त ठेवून असतो. वाई तालुक्यात सध्या ऊसाच्या लागवडीला जोर आला असून, शेतात सध्या शेतकरी हा ऊसाची लागवड करताना दिसत आहे. याबाबत कारखान्याने वेळेत ऊसाची तोड करावी व तालुक्यातील बळीराजाला धीर देण्याचे काम करावे. ऊस हे श्रीमंताचे पीक असल्याचे मानले जाते; परंतु या पिकासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चौकट...

बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार

खते, बियाणे, शेताची मशागत, मजूर, लागणारे पाणी यासाठी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज काढतो. त्याचे व्याजही काहीवेळा निघत नाही. तरीही ऊसाच्या अंतर्गत होणाऱ्या इतर पिकांच्या उत्पन्नात समाधान मानून बळीराजा हे धाडस करताना दिसत आहे, अन्यथा साखर कारखाने व निसर्ग यांच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन बळीराजा अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, तरी ऊसाला तुरे आल्याने त्वरित ऊसाची तोड करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे अशीही मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार आहेत.