शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

sugarcane rate agitation: ज्यांच्यासाठी संघर्ष करायचा, त्यांचीच मिळेना शेतकरी संघटनांना ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:15 IST

कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या रानाची परवड

सातारा : शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून उसाला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलने करण्यात येत असली, तरी खुद्द शेतकऱ्यांकडून त्याला अपेक्षित पाठबळ मिळत नसल्यामुळे संघर्षाची तीव्रता मर्यादित राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांच्यासाठी ते लढा देत आहेत, तेच शेतकरी संघटनांसोबत रस्त्यावर उतरत नाहीत, ही खंत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस व दुधाला चांगला दर मिळावा म्हणून उग्र आंदोलन छेडले होते. त्यांच्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, कोल्हापुरातील साखर कारखान्यांना शेतकरी संघटनांची ताकद कळून आली. परिणामी, त्या जिल्ह्यांमध्ये कारखानदारांना दर ठरवताना संघटनांच्या मागण्यांचा विचार करणे भाग आहे.सातारा जिल्ह्यात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. कराड तालुक्यात काही प्रमाणात शेतकरी संघटना सक्रिय असल्या, तरी जिल्ह्यातील इतर भागात संघटनांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यात जवळपास दीड लाखांपर्यंत शेतकरी असून, १ लाख १५ हजार हेक्टरमध्ये ऊस लागवड केली जाते. या सर्व शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना संघर्ष करत आहेत. त्यांचे मनोबल वाढण्यासाठी शेतकऱ्यांची साथ गरजेची आहे.

कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या रानाची परवडसंघटनांच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, पोलिसांकडून धरपकड झाली. तर काहींवर साखर दबावतंत्रांचा अवलंब करण्यात आला असून, उसाला तोड येण्यासाठी व्यवस्थापनाकडे अनेक हेलपाटे घालावे लागतात. कारखान्यांविरोधात आंदोलन केल्याचे उट्टे अशारितीने काढण्यात येत असल्याचे संघटनांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांचा ऊस रानातच वाळवला जातो; परंतु उसाला तोड येत नाही. तसेच दमदाटीचेही प्रकार घडले आहेत. आर्थिक कोंडी करून कार्यकर्त्यांचे कंबरडे मोडले जाते. तरीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही. परंतु, शेतकऱ्यांनीही ऊस दरासाठीच्या संघर्षाला साथ देणे हीच काळाची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटनाजिल्ह्यातील संघटना केवळ ऊस पिकासाठी आंदोलन करतात. परंतु, सोयाबीन, कांदा, गहू, ज्वारी, भात ही पिकेही शेतकरी घेतो; परंतु त्यांना चांगला दर मिळत नाही. त्याबद्दल संघटना बोलत नाही. संघटनांनी सर्व पिकांना योग्य दर देण्यासाठी लढा उभारावा आणि शेवटपर्यंत न्यावा. - महेश कदम, शेतकरी

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane rate agitation: Farmer organizations lack support from farmers themselves.

Web Summary : Satara farmers face low sugarcane rates. Despite farmer organizations' protests, limited farmer support hinders progress. Activists lament farmers' reluctance to join the fight for better prices, impacting movement strength.