शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Satara: पाण्यावर खर्च पाच लाख; तरी स्वप्नांची राख!; दुष्काळासाठी शासनाची दमडीची नाही मदत 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2024 19:29 IST

फळबागांसाठी सोलापूर जिल्ह्यातून विकतचे पाणी

सातारा : माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच. त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय. मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांचा यावरच चार-पाच लाखांपर्यंत खर्च झालाय. तरीही उत्पन्नाबाबत ठेंगाच आहे. त्यातच दुष्काळ असूनही शासनाकडून दमडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप होत आहे.माण तालुक्याचा तसेच सातारा जिल्ह्याचाही पूर्व भाग म्हणजे हवालदारवाडी, कारखेल ही गावे. या भागात फळबागांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकरी कष्टाळू. त्यामुळे एकेकाच्या पाच, दहा एकरापर्यंतही डाळिंब आणि आंब्याच्या बागा आहेत; पण या बागांना दृष्ट लागली आहे. कारण गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. पाणी नसल्याने बागा वाळू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यासाठी गावाच्या शेजारीच सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. शेजारील माळशिरस तालुक्यात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे हे शेतकरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून सोलापूर जिल्ह्यातून विकत पाणी आणत आहेत. साडेतीन हजार रुपयांना ३० हजार लिटरचा टॅंकर मिळतोय. मागील काही महिन्यांपासून पाण्यावरच पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे, तरीही फळबागातून चांगले उत्पन्न मिळेलच, याची शास्वती नाही.हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकरी उद्धव उदंडे यांची सात एकर आंबा, तर डाळिंबाची अडीच एकर बाग आहे. या बागा जगविणे आणि जनावरांसाठी दररोज एक पाण्याचा टॅंकर लागतोय. आतापर्यंत त्यांचा पाण्यावर पाच लाख रुपये खर्च झाला आहे. तरीही त्यांना आंब्यातून फक्त चार ते साडेचार लाख रुपयेच उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यांचा आतापर्यंत खत, मजुरी, पाणी, औषधावर १० लाखांपर्यंत खर्च झाला आहे. झाडे जपली पाहिजेत. ती वाळवून परत काय करायचे असे म्हणत खर्च करावाच लागतो. पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल असे ते सांगतात. कारण, यंदा आंबा उन्हाने खराब झालाय, तसेच पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे वाळू लागली आहेत. फक्त सध्या झाडे जगविण्याचेच काम सुरू आहे. अशीच स्थिती परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे, तरीही शासन मदत करत नाही, अशी खंतही हे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जमीन ५० एकर अन् विहिरी पाच...येथील शेतकरी हणमंत तुकाराम फडतरे यांची जवळपास ५० एकर जमीन आहे. त्यातील ४० एकर बागायत. त्यासाठी पाच विहिरी आहेत; पण आतापर्यंत आंबा आणि डाळिंबासाठी पाणी विकत घ्यावे लागले. त्यावर दोन लाख रुपये खर्च झाला आहे.

६० किलोमीटरवरून चारा; दुधाचे पैसे त्यावर खर्च..माण तालुक्यातच ओला चारा मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतून हिरवा चारा विकत आणला आहे. त्यावर दुभती जनावरे आहेत. दुधाचे पैसे चाऱ्यावर अशीच शेतकऱ्यांची धारणा झालेली आहे, तर जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. सव्वा लाखाची गाय ६० हजारांना मागण्यात आली, असेही एका शेतकऱ्याने सांगितले.

गावात दुष्काळ पडला आहे. परिसरात कोठेही पाणी नाही. सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणून बागा जगवत आहे; पण उत्पन्न कमी असल्याने तोटाच होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून मदत मिळायला हवी. तसेच बागांचा विमाही भरलाय. त्यातून तरी मदत व्हावी; पण आतापर्यंत काहीच मदत मिळालेली नाही. बागा वाळवून चालत नाही म्हणून पाण्यावर खर्च करावा लागत आहे. - उद्धव उदंडे, शेतकरी

कारखेल गावाला दिवाळीपासून टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. गावातील ५०० फूट खोलवरील बोअरलाही पाणी नाही. माझी १० एकर डाळिंब बाग असून माळशिरस तालुक्यातून पाणी विकत आणतोय. आतापर्यंत पाण्यावरच तीन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग जाळून चालत नाही. फळबागांचा विमा भरला आहे, त्यातून तरी शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच मागणी आहे. - शशिकांत गायकवाड, सरपंच कारखेल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणीSolapurसोलापूर