शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाण्यावर खर्च पाच लाख; तरी स्वप्नांची राख!; दुष्काळासाठी शासनाची दमडीची नाही मदत 

By नितीन काळेल | Updated: May 23, 2024 19:29 IST

फळबागांसाठी सोलापूर जिल्ह्यातून विकतचे पाणी

सातारा : माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच. त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय. मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांचा यावरच चार-पाच लाखांपर्यंत खर्च झालाय. तरीही उत्पन्नाबाबत ठेंगाच आहे. त्यातच दुष्काळ असूनही शासनाकडून दमडीचीही मदत झाली नसल्याचा आरोप होत आहे.माण तालुक्याचा तसेच सातारा जिल्ह्याचाही पूर्व भाग म्हणजे हवालदारवाडी, कारखेल ही गावे. या भागात फळबागांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकरी कष्टाळू. त्यामुळे एकेकाच्या पाच, दहा एकरापर्यंतही डाळिंब आणि आंब्याच्या बागा आहेत; पण या बागांना दृष्ट लागली आहे. कारण गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. पाणी नसल्याने बागा वाळू लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यासाठी गावाच्या शेजारीच सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. शेजारील माळशिरस तालुक्यात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे हे शेतकरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून सोलापूर जिल्ह्यातून विकत पाणी आणत आहेत. साडेतीन हजार रुपयांना ३० हजार लिटरचा टॅंकर मिळतोय. मागील काही महिन्यांपासून पाण्यावरच पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे, तरीही फळबागातून चांगले उत्पन्न मिळेलच, याची शास्वती नाही.हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकरी उद्धव उदंडे यांची सात एकर आंबा, तर डाळिंबाची अडीच एकर बाग आहे. या बागा जगविणे आणि जनावरांसाठी दररोज एक पाण्याचा टॅंकर लागतोय. आतापर्यंत त्यांचा पाण्यावर पाच लाख रुपये खर्च झाला आहे. तरीही त्यांना आंब्यातून फक्त चार ते साडेचार लाख रुपयेच उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यांचा आतापर्यंत खत, मजुरी, पाणी, औषधावर १० लाखांपर्यंत खर्च झाला आहे. झाडे जपली पाहिजेत. ती वाळवून परत काय करायचे असे म्हणत खर्च करावाच लागतो. पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल असे ते सांगतात. कारण, यंदा आंबा उन्हाने खराब झालाय, तसेच पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे वाळू लागली आहेत. फक्त सध्या झाडे जगविण्याचेच काम सुरू आहे. अशीच स्थिती परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे, तरीही शासन मदत करत नाही, अशी खंतही हे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जमीन ५० एकर अन् विहिरी पाच...येथील शेतकरी हणमंत तुकाराम फडतरे यांची जवळपास ५० एकर जमीन आहे. त्यातील ४० एकर बागायत. त्यासाठी पाच विहिरी आहेत; पण आतापर्यंत आंबा आणि डाळिंबासाठी पाणी विकत घ्यावे लागले. त्यावर दोन लाख रुपये खर्च झाला आहे.

६० किलोमीटरवरून चारा; दुधाचे पैसे त्यावर खर्च..माण तालुक्यातच ओला चारा मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतून हिरवा चारा विकत आणला आहे. त्यावर दुभती जनावरे आहेत. दुधाचे पैसे चाऱ्यावर अशीच शेतकऱ्यांची धारणा झालेली आहे, तर जनावरांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. सव्वा लाखाची गाय ६० हजारांना मागण्यात आली, असेही एका शेतकऱ्याने सांगितले.

गावात दुष्काळ पडला आहे. परिसरात कोठेही पाणी नाही. सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणून बागा जगवत आहे; पण उत्पन्न कमी असल्याने तोटाच होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असून मदत मिळायला हवी. तसेच बागांचा विमाही भरलाय. त्यातून तरी मदत व्हावी; पण आतापर्यंत काहीच मदत मिळालेली नाही. बागा वाळवून चालत नाही म्हणून पाण्यावर खर्च करावा लागत आहे. - उद्धव उदंडे, शेतकरी

कारखेल गावाला दिवाळीपासून टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. गावातील ५०० फूट खोलवरील बोअरलाही पाणी नाही. माझी १० एकर डाळिंब बाग असून माळशिरस तालुक्यातून पाणी विकत आणतोय. आतापर्यंत पाण्यावरच तीन लाख रुपये खर्च झाला आहे. बाग जाळून चालत नाही. फळबागांचा विमा भरला आहे, त्यातून तरी शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच मागणी आहे. - शशिकांत गायकवाड, सरपंच कारखेल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणीSolapurसोलापूर