शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 11:57 IST

माळशिरस, सांगोला, फलटणमधील शेतकरी आक्रमक

फलटण (सातारा) : नीरा उजवा कालव्यातील पाण्यावरून माळशिरस, सांगोला आणि फलटण येथील शेतकरी आक्रमक झाले असून, तिन्ही तालुक्यांतील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी फलटण येथील उपअभियंता नीरा उजवा कालवा कार्यालयावर विराट मोर्चा काढला. शेतीसाठी आवर्तन पुन्हा सुरू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार करीत आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी उपअभियंता यांना देण्यात आले.नीरा कालव्याचे आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने तिन्ही तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. आवर्तन पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळपासूनच शेतकरी नीरा कालवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले. हळूहळू ही गर्दी वाढत गेली. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे आवर्तन बंद करण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.कालवा सुरू करताना कालवा सल्लागार समितीतील सदस्यांना सांगता, मग बंद करताना कोणाला विचारून बंद केला, असा सवाल रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना दि. १९ मेपर्यंतची मुदत देत आवर्तन पूर्ण करून मग उर्वरित कामे मार्गी लावावीत, अन्यथा याहीपेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आमदार दीपक चव्हाण यांनी चोवीस तासांत दुरुस्तीचे काम करून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.दुरुस्तीसाठी कालवा बंदनीरा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नीरा उजवा कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता आहे. कालव्यालगत असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरून वित्त व जीवितहानी होऊ शकते, अशी माहिती नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.हक्कभंग आणूकालवा दुरुस्तीच्या कामी कोणती यंत्रणा सक्रिय आहे, असे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी विचारले असता, दोन पोकलँड व दोन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र शेतकऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे केवळ दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आला. यावरून रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकारी जनतेसमोर खोटी माहिती देत असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन