शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मुंबई पालिकेतून सेनेला बाहेर काढू, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:53 IST

भाजपने मनसेला बरोबर घेतले, तर पहिल्यांदा ते माझ्याशी बोलतील, पण हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसेला फार मते मिळणार नाहीत. त्यांचं भाषण आणि सभांचंच वादळ आहे, असा टोमणाही मारला.

सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ही बाब गंभीर, तसेच दुर्दैवी आहे, याची माहिती पोलिसांनाही हवी होती, पण याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून, एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी कठीण नाही,’ अशी रोखठोक भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व मिळूनही पक्षाला यश मिळत नाही. त्यातच महाराष्ट्रातील तीन पक्षांचे एकत्रीकरण चुकीचे ठरले आहे. शिवसेनेवरही लोकांचा विश्वास नाही. मतदार नाराज आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपच १०० टक्के जिंकणार हा विश्वास आहे. त्याचबरोबर, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष ४०० हून अधिक जागा जिंकतील. राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर असेल.

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री आठवले म्हणाले, ‘आंदोलन हे शांततेत व्हायला हवं होतं. हा हल्ला दुर्दैवी आहे. मी राज्यात मंत्री असताना अशी मागणी झाली नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले, पगार नाही. त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर होतो का, या प्रश्नावर त्यांनी या यंत्रणा मुद्दाम चौकशी करीत नाहीत. कोणाला चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात पुरावे द्यावेत. कारण या यंत्रणा स्वतंत्र व कोणाच्याही दबावाखाली तपास करीत नाहीत, असे उत्तर दिले. इंधनदरवाढीवर त्यांनी निवडणुका आल्या की, दर कमी होतील, असे उत्तरही हास्य करीत दिले.

मुंबई पालिकेतून सेनेला बाहेर काढू; मनसेचं भाषणाचं वादळ...

पत्रकार परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी भाजप आणि ‘रिपाइं’ एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेला बाहेर काढू. त्याचप्रमाणे, नियोजन सुरू आहे, असे सांगितले, तर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. मनसेला बरोबर घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आठवले यांनी, मनसेची गरज नाही. भाजपने त्यांना बरोबर घेतले, तर पहिल्यांदा ते माझ्याशी बोलतील, पण हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसेला फार मते मिळणार नाहीत. त्यांचं भाषण आणि सभांचंच वादळ आहे, असा टोमणाही मारला.

दोन्हीराजेंमधील वाद मिटवणार...

साताऱ्यातील दोन्ही राजेंशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. एक आमदार असून, दुसरे खासदार आहेत. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे