शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

मुंबई पालिकेतून सेनेला बाहेर काढू, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:53 IST

भाजपने मनसेला बरोबर घेतले, तर पहिल्यांदा ते माझ्याशी बोलतील, पण हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसेला फार मते मिळणार नाहीत. त्यांचं भाषण आणि सभांचंच वादळ आहे, असा टोमणाही मारला.

सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ही बाब गंभीर, तसेच दुर्दैवी आहे, याची माहिती पोलिसांनाही हवी होती, पण याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून, एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी कठीण नाही,’ अशी रोखठोक भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

मंत्री आठवले म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नेतृत्व मिळूनही पक्षाला यश मिळत नाही. त्यातच महाराष्ट्रातील तीन पक्षांचे एकत्रीकरण चुकीचे ठरले आहे. शिवसेनेवरही लोकांचा विश्वास नाही. मतदार नाराज आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपच १०० टक्के जिंकणार हा विश्वास आहे. त्याचबरोबर, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष ४०० हून अधिक जागा जिंकतील. राज्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर असेल.

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री आठवले म्हणाले, ‘आंदोलन हे शांततेत व्हायला हवं होतं. हा हल्ला दुर्दैवी आहे. मी राज्यात मंत्री असताना अशी मागणी झाली नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले, पगार नाही. त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर होतो का, या प्रश्नावर त्यांनी या यंत्रणा मुद्दाम चौकशी करीत नाहीत. कोणाला चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात पुरावे द्यावेत. कारण या यंत्रणा स्वतंत्र व कोणाच्याही दबावाखाली तपास करीत नाहीत, असे उत्तर दिले. इंधनदरवाढीवर त्यांनी निवडणुका आल्या की, दर कमी होतील, असे उत्तरही हास्य करीत दिले.

मुंबई पालिकेतून सेनेला बाहेर काढू; मनसेचं भाषणाचं वादळ...

पत्रकार परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी भाजप आणि ‘रिपाइं’ एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेतून शिवसेनेला बाहेर काढू. त्याचप्रमाणे, नियोजन सुरू आहे, असे सांगितले, तर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. मनसेला बरोबर घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आठवले यांनी, मनसेची गरज नाही. भाजपने त्यांना बरोबर घेतले, तर पहिल्यांदा ते माझ्याशी बोलतील, पण हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मनसेला फार मते मिळणार नाहीत. त्यांचं भाषण आणि सभांचंच वादळ आहे, असा टोमणाही मारला.

दोन्हीराजेंमधील वाद मिटवणार...

साताऱ्यातील दोन्ही राजेंशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. एक आमदार असून, दुसरे खासदार आहेत. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे