शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसाचा जोर कमी, तरी धरणांत पाण्याची आवक कायम; सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:20 IST

कोयना, नवजा येथे किती झाला पाऊस.. 

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असलातरी प्रमुख धरणांत पाण्याची आवक कायम आहे. यामुळे कोयनासह प्रमुख सहा प्रकल्पांत १०२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या ही धरणे सुमारे ६९ टक्के भरलीत. यामुळे चिंता मिटलेली आहे. तर २४ तासात कोयनेला ४२ आणि नवजा येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यांपासून पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे पश्चिम भाग आबादाणी झाला आहे. तसेच पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. जून महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू झाल्यापासून या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. बुधवारी सकाळच्या सुुमारास या धरणांमध्ये १०२.३६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. याची टक्केवारी ६८.८२ इतकी झाली आहे. कोयना धरणात ७१.१२ टीएमसी तर धोममध्ये ९.७०, बलकवडी २.०४, कण्हेर ७.४२, तारळी ४.९९ आणि उरमोडी धरणात ७.०९ टीएमसी पाणीसाठा होता. धोम ७२ तर तारळी धरण ८५ टक्के भरलेले आहे. त्याचबरोबर सध्या चार धरणांतून पाणी विसर्ग सुरूच आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जात होता. तर कण्हेरमधून २ हजार ३१४, उरमोडी धरणातून १ हजार ८२८ आणि तारळीमधून २ हजार ३७७ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात केला जात होता. यामुळे वेण्णा, तारळी आणि उरमोडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही घटण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कोयनेला २१०६ मिलिमीटर पर्जन्यमान..जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्याने सवा महिना झाला आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४२, नवजाला ३३ आणि महाबळेश्वर येथे २१ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून कोयनेला २ हजार १०६, नवजा १ हजार ८९१ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ९६१ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणात सुमारे १५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. पाणी आवक कमी झाली आहे. तर धरणात ७१.११ टीएमसी साठा झाला होता. ६७.५६ टक्के हा साठा आहे.