शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा.. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या ...

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.

आषाढ महिना नवविवाहितांसाठी आतुरतेचा असतो. या महिन्यात पाच दिवस नवविवाहितांना हक्काने माहेरी आणले जाते. याच दरम्यान येणारे श्रावण सण आणि त्यातील खेळ नवविवाहितांच्या विशेष आवडीचे असतात; मात्र गेल्या सव्वा वर्षात कोरोनाचे संकट ठाकले आणि प्रत्येकाला घरातच राहण्याची वेळ आली. त्यामुळे ज्यांचे माहेर दूर आहे. अशा नवीन विवाह झालेल्या मुलींना आपल्या माहेरची आठवण सतावू लागली आहे.

आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि खेळ यंदाही होणार नाहीत असे चित्र दिसते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.

चौकट

मुलीला बघण्यासाठी व्हिडिओ कॉल

लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाणार हे माहीत असते पण ती तिच्या स्वत:च्या घरी गेली तरी आपलं घर रिकामं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं आम्ही तिला कुठंच बाहेर पाठवलं नव्हतं. पण आता गेल्या दोन महिन्यांत तिला बघायचं असेल तर केवळ व्हिडिओ कॉल हाच एकमेव पर्याय आहे.

००००००००००

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या माहेरी यायला मुलगीच कचरत आहे. तिच्या मतानुसार लांबून प्रवास करुन माहेरी यायचं. या प्रवासात जर काही बाधा झाली तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. यामुळे हे संकट टळावं आणि लेक माहेराला यावं असं वाटतं.

कोट

सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं. कोल्हापूर सासर असल्याने कोणी भेटत असतं. मर्यादित झालेल्या लग्न सोहळ्यातही आता माहेरकडच्यांच्या गाठीभेटी पडतात. त्यामुळे माहेरच्या लोकांना भेटणं होतं. अडचण माहेरी राहण्याची आहे. कोरोनामुळे प्रवास करुन येऊन राहणं आरोग्याच्या दृष्टीनेही हानीकारक असल्याने ते मी टाळतेच.

- नेहा जाधव, कोल्हापूर.

कोरोना आता जाईल, मग जाईल म्हणत दीड वर्षे मुक्काम ठोकला. लग्नही कमी लोकांत केलं आणि नंतर गेट टूगेदर करु असं आम्ही ठरवलं होतं. पण दुर्दैवाने लग्नाला आठ महिने झाले तरीही कोरोना जायचा नाही, अशीच भावना मनात येत आहे.