शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा.. वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या ...

सातारा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढात आपल्या माहेरी येणाऱ्या नवविवाहितांना जाता येत नसल्याची खंत लागून राहिली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, अशी स्थिती नवविवाहितांची झाली आहे.

आषाढ महिना नवविवाहितांसाठी आतुरतेचा असतो. या महिन्यात पाच दिवस नवविवाहितांना हक्काने माहेरी आणले जाते. याच दरम्यान येणारे श्रावण सण आणि त्यातील खेळ नवविवाहितांच्या विशेष आवडीचे असतात; मात्र गेल्या सव्वा वर्षात कोरोनाचे संकट ठाकले आणि प्रत्येकाला घरातच राहण्याची वेळ आली. त्यामुळे ज्यांचे माहेर दूर आहे. अशा नवीन विवाह झालेल्या मुलींना आपल्या माहेरची आठवण सतावू लागली आहे.

आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गावागावात वेगवेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि खेळ यंदाही होणार नाहीत असे चित्र दिसते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत.

चौकट

मुलीला बघण्यासाठी व्हिडिओ कॉल

लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाणार हे माहीत असते पण ती तिच्या स्वत:च्या घरी गेली तरी आपलं घर रिकामं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं आम्ही तिला कुठंच बाहेर पाठवलं नव्हतं. पण आता गेल्या दोन महिन्यांत तिला बघायचं असेल तर केवळ व्हिडिओ कॉल हाच एकमेव पर्याय आहे.

००००००००००

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या माहेरी यायला मुलगीच कचरत आहे. तिच्या मतानुसार लांबून प्रवास करुन माहेरी यायचं. या प्रवासात जर काही बाधा झाली तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. यामुळे हे संकट टळावं आणि लेक माहेराला यावं असं वाटतं.

कोट

सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं. कोल्हापूर सासर असल्याने कोणी भेटत असतं. मर्यादित झालेल्या लग्न सोहळ्यातही आता माहेरकडच्यांच्या गाठीभेटी पडतात. त्यामुळे माहेरच्या लोकांना भेटणं होतं. अडचण माहेरी राहण्याची आहे. कोरोनामुळे प्रवास करुन येऊन राहणं आरोग्याच्या दृष्टीनेही हानीकारक असल्याने ते मी टाळतेच.

- नेहा जाधव, कोल्हापूर.

कोरोना आता जाईल, मग जाईल म्हणत दीड वर्षे मुक्काम ठोकला. लग्नही कमी लोकांत केलं आणि नंतर गेट टूगेदर करु असं आम्ही ठरवलं होतं. पण दुर्दैवाने लग्नाला आठ महिने झाले तरीही कोरोना जायचा नाही, अशीच भावना मनात येत आहे.