शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अठरा हजार हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

By admin | Updated: July 2, 2017 16:36 IST

धोम-बलकवडी कालवा : अस्तरीकरणास प्रारंभ; १ हजार २९१ कोटींची तरतुद

आॅनलाईन लोकमतखंडाळा , दि. 0२ : खंडाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम बलकवडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अस्तरीकरणानंतर प्रवाही पाण्याचा वेग वाढणार असला तरी खंडाळा तालुक्याला मात्र यापुढे अधिकृत पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी १ हजार २९१ कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्याद्वारे तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे . कालव्यातून पाझर पध्दतीने ठिकठिकाणी पाणी वाहत असल्याने आजपर्यंत ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी वाहताना दिसत होते . या कालव्याद्वारे भोर तालुक्यातील १ हजार ५० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ४ हजार ३०० हेक्टर व फलटण तालुक्यातील १२ हजार ७५० हेक्टर अशी एकूण १८ हजार १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

धोम बलकवडी धरण व कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जुन २०१८ पर्यंत कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करण्याचे आदेश जलसंधारण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामात वेग घेतला आहे. या कामानंतर खंडाळा तालुक्याला करारानुसार केवळ ०.६४ अघ फूट प्रवाही पाणीच वापरता येणार आहे. त्यामुळे या वषापार्सून शेतकाऱ्यांना पाणी साठवण व शेती सिंचनाचे योग्य नियोजन करावे लागेल.

निरा देवघरी कामे अपूर्ण...

धोम बलकवडी कालव्यासाठी प्रकल्प जलनियोजनातून २ .७० अ .घ . फूट पाणी सोडण्यात येते मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार निरा देवघर प्रकल्पातील ०.९३ अ. घ. फूट पाणी धोम बलकवडीच्या कालव्यात अतिरिक्त सोडण्यास मंजूरी दिली आहे . त्यामुळे एकूण ३ .६३ अ .घ . फूट पाणी वापर प्रस्तावित केला आहे . मात्र नीरा देवघरची कामे अपूर्ण ठेवून सुमारे एक टीएमसी पाणी धोम कालव्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याने खंडाळा तालुक्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे .खंडाळा तालुक्याला धोम बलकवडी प्रकल्पाच्या पाण्याबरोबरच नीरा देवघरच्या पाण्याचा अधिक फायदा आहे . नीरा देवघर प्रकल्पाची मंजूरी अगोदरची असताना या कालव्याची कामे अपूर्ण ठेवून पाणी दुसरीकडे वापरायला देणे हे या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय आहे . शासनाच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. याही कालव्याची कामे पूर्ण करून हक्काचे पाणी खंडाळा तालुक्याला मिळाले पाहिजे.- अ?ॅड . बाळासाहेब बागवान,

अध्यक्ष पाणी पंचायत