शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

अठरा हजार हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

By admin | Updated: July 2, 2017 16:36 IST

धोम-बलकवडी कालवा : अस्तरीकरणास प्रारंभ; १ हजार २९१ कोटींची तरतुद

आॅनलाईन लोकमतखंडाळा , दि. 0२ : खंडाळा तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम बलकवडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अस्तरीकरणानंतर प्रवाही पाण्याचा वेग वाढणार असला तरी खंडाळा तालुक्याला मात्र यापुढे अधिकृत पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी १ हजार २९१ कोटी रुपयांची चतुर्थ सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणाच्या निर्मितीपासून या कालव्याद्वारे तालुक्यात पाणी सोडण्यात येत आहे . कालव्यातून पाझर पध्दतीने ठिकठिकाणी पाणी वाहत असल्याने आजपर्यंत ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी वाहताना दिसत होते . या कालव्याद्वारे भोर तालुक्यातील १ हजार ५० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ४ हजार ३०० हेक्टर व फलटण तालुक्यातील १२ हजार ७५० हेक्टर अशी एकूण १८ हजार १०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

धोम बलकवडी धरण व कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जुन २०१८ पर्यंत कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करण्याचे आदेश जलसंधारण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामात वेग घेतला आहे. या कामानंतर खंडाळा तालुक्याला करारानुसार केवळ ०.६४ अघ फूट प्रवाही पाणीच वापरता येणार आहे. त्यामुळे या वषापार्सून शेतकाऱ्यांना पाणी साठवण व शेती सिंचनाचे योग्य नियोजन करावे लागेल.

निरा देवघरी कामे अपूर्ण...

धोम बलकवडी कालव्यासाठी प्रकल्प जलनियोजनातून २ .७० अ .घ . फूट पाणी सोडण्यात येते मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार निरा देवघर प्रकल्पातील ०.९३ अ. घ. फूट पाणी धोम बलकवडीच्या कालव्यात अतिरिक्त सोडण्यास मंजूरी दिली आहे . त्यामुळे एकूण ३ .६३ अ .घ . फूट पाणी वापर प्रस्तावित केला आहे . मात्र नीरा देवघरची कामे अपूर्ण ठेवून सुमारे एक टीएमसी पाणी धोम कालव्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याने खंडाळा तालुक्याचे मोठे नुकसान होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे .खंडाळा तालुक्याला धोम बलकवडी प्रकल्पाच्या पाण्याबरोबरच नीरा देवघरच्या पाण्याचा अधिक फायदा आहे . नीरा देवघर प्रकल्पाची मंजूरी अगोदरची असताना या कालव्याची कामे अपूर्ण ठेवून पाणी दुसरीकडे वापरायला देणे हे या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय आहे . शासनाच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. याही कालव्याची कामे पूर्ण करून हक्काचे पाणी खंडाळा तालुक्याला मिळाले पाहिजे.- अ?ॅड . बाळासाहेब बागवान,

अध्यक्ष पाणी पंचायत