शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:47 IST

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या ...

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या पावसात हे बंधारे गाळाने नव्हे तर पाण्याने तुडुंब भरणार आहेत.मूळ चोरे गावचे; पण नोकरी निम्मिताने मुंंबई, पुणे, सातारा, कºहाड अशा अनेक गावात स्थायिक झालेल्या चोरेकरांनी ‘चोरे विकास मंच’ स्थापन केला आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून सलग तीन रविवारी गाळाने भरलेल्या तीन बंधाºयातून सुमारे साडेतीनशे ट्रॉली गाळ उपसला. शेतकºयांच्या शेतीला हा गाळ दिला.चोरे व परिसरात नेहमीच शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होत असतो. याठिकाणी अनेक बंधारे बांधून पाणी अडवण्याचा व जिरवण्याचा प्रयत्न झाला आहे; परंतु हे बंधारे गाळाने भरून गेले असल्यामुळे डोंगरावरून पावसाचे आलेले पाणी बंधाºयात अडत नाही. ते ओढ्याने खाली येऊन नदीला मिळते. ‘चोरे विकास मंच’च्या वतीने या परिसरातील गाळाने भरलेले तीन बंधारे गाळमुक्त करण्याचा निर्धार केला. दर रविवारी एक बंधारा अशा पद्धतीने सकाळी सात वाजता कामास सुरुवात करण्यात येत होती. मंचचे सदस्य जवान शरद भोसले यांनी स्वत:चा ट्रॅक्टर माती वाहण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर शेतकºयांनीही स्वत:चे सुमारे १० ट्रॅक्टर गाळ वाहतुकीसाठी दिले. विकास मंचच्या वतीने जेसीबी भाडेतत्वावर आणण्यात आला होता. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मंचचे सदस्य संजय गोळे, दिलीप साळुंखे, प्रा. महेश लोखंडे, प्रा. जगन्नाथ देटके, राजकुमार माने, आबासाहेब लोखंडे, अंगद साळुंखे, सचिन भोसले, महेश सकटे, सतीश गोळे ही मंडळी दिवसभर कामाच्या ठिकाणी थांबू लागली. बंधाºयात उगवलेली झुडपे तोडणे, माती नेण्यासाठी नियोजन करणे, वाहने काढण्यास मदत करणे, वाहन चालकांना चहापाणी देऊन त्यांचा उत्साह वाढविणे हे काम हे करीत होते.या उपक्रमात ज्यांना सहभागी होता येत नव्हते, अशा दत्तात्रय यादव, सुभाष गोळे, प्रा. अरविंद गोळे, रवी कवळे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, जवान विजय साळुंखे, निखिल साळुंखे, संतोष गोळे, माऊली साळुंखे, जवान सचिन साळुंखे, अनिल लोखंडे यांनी आर्थिक पाठबळ दिले. हा उपक्रम सलग तीन रविवारी यशस्वी राबवला गेला. हे तीन बंधारे गाळमुक्त करण्यासाठी सावरघरचे सुहास पाटील, रामदास बाबर, भांबेचे संदीप पाटील, अप्पासाहेब साळुंखे यांनी गाळ स्वत:च्या वाहनाने नेऊन या उपक्रमास सहकार्य केले.चांगल्या विचारांचे युवक एकत्र आल्यावर काहीही शक्य होते, हे या निमित्ताने या मंचच्या युवकांनी दाखवून दिले आहे.तीन बंधाºयांत चाळीस लाख लिटर पाणी साचणारगाळ काढल्यामुळे आता या तीन बंधाºयांत सुमारे चाळीस लाख लिटर पाणी साठवण होईल, असा अंदाज शासकीय अधिकाºयांनी वर्तवला आहे. या बांधºयात साठणाºया पाण्यावर सुमारे तीस एकर शेतीक्षेत्र भिजणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाणी पाझराच्या माध्यमातून खालच्या भागातील विहिरीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.