शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नोकरदारांच्या कष्टानं गाव होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:47 IST

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या ...

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याचा प्रत्यय पाणी फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतून सर्वांना येत आहे. मात्र, कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी एकवटलेल्या चोरे, ता. कºहाड येथील नोकरदारांनी श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ उपसला. त्यामुळे येत्या पावसात हे बंधारे गाळाने नव्हे तर पाण्याने तुडुंब भरणार आहेत.मूळ चोरे गावचे; पण नोकरी निम्मिताने मुंंबई, पुणे, सातारा, कºहाड अशा अनेक गावात स्थायिक झालेल्या चोरेकरांनी ‘चोरे विकास मंच’ स्थापन केला आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून सलग तीन रविवारी गाळाने भरलेल्या तीन बंधाºयातून सुमारे साडेतीनशे ट्रॉली गाळ उपसला. शेतकºयांच्या शेतीला हा गाळ दिला.चोरे व परिसरात नेहमीच शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होत असतो. याठिकाणी अनेक बंधारे बांधून पाणी अडवण्याचा व जिरवण्याचा प्रयत्न झाला आहे; परंतु हे बंधारे गाळाने भरून गेले असल्यामुळे डोंगरावरून पावसाचे आलेले पाणी बंधाºयात अडत नाही. ते ओढ्याने खाली येऊन नदीला मिळते. ‘चोरे विकास मंच’च्या वतीने या परिसरातील गाळाने भरलेले तीन बंधारे गाळमुक्त करण्याचा निर्धार केला. दर रविवारी एक बंधारा अशा पद्धतीने सकाळी सात वाजता कामास सुरुवात करण्यात येत होती. मंचचे सदस्य जवान शरद भोसले यांनी स्वत:चा ट्रॅक्टर माती वाहण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर शेतकºयांनीही स्वत:चे सुमारे १० ट्रॅक्टर गाळ वाहतुकीसाठी दिले. विकास मंचच्या वतीने जेसीबी भाडेतत्वावर आणण्यात आला होता. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत मंचचे सदस्य संजय गोळे, दिलीप साळुंखे, प्रा. महेश लोखंडे, प्रा. जगन्नाथ देटके, राजकुमार माने, आबासाहेब लोखंडे, अंगद साळुंखे, सचिन भोसले, महेश सकटे, सतीश गोळे ही मंडळी दिवसभर कामाच्या ठिकाणी थांबू लागली. बंधाºयात उगवलेली झुडपे तोडणे, माती नेण्यासाठी नियोजन करणे, वाहने काढण्यास मदत करणे, वाहन चालकांना चहापाणी देऊन त्यांचा उत्साह वाढविणे हे काम हे करीत होते.या उपक्रमात ज्यांना सहभागी होता येत नव्हते, अशा दत्तात्रय यादव, सुभाष गोळे, प्रा. अरविंद गोळे, रवी कवळे, मकरंद कुलकर्णी, प्रवीण साळुंखे, जवान विजय साळुंखे, निखिल साळुंखे, संतोष गोळे, माऊली साळुंखे, जवान सचिन साळुंखे, अनिल लोखंडे यांनी आर्थिक पाठबळ दिले. हा उपक्रम सलग तीन रविवारी यशस्वी राबवला गेला. हे तीन बंधारे गाळमुक्त करण्यासाठी सावरघरचे सुहास पाटील, रामदास बाबर, भांबेचे संदीप पाटील, अप्पासाहेब साळुंखे यांनी गाळ स्वत:च्या वाहनाने नेऊन या उपक्रमास सहकार्य केले.चांगल्या विचारांचे युवक एकत्र आल्यावर काहीही शक्य होते, हे या निमित्ताने या मंचच्या युवकांनी दाखवून दिले आहे.तीन बंधाºयांत चाळीस लाख लिटर पाणी साचणारगाळ काढल्यामुळे आता या तीन बंधाºयांत सुमारे चाळीस लाख लिटर पाणी साठवण होईल, असा अंदाज शासकीय अधिकाºयांनी वर्तवला आहे. या बांधºयात साठणाºया पाण्यावर सुमारे तीस एकर शेतीक्षेत्र भिजणार आहे. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाणी पाझराच्या माध्यमातून खालच्या भागातील विहिरीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.