शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

By नितीन काळेल | Updated: January 8, 2024 19:11 IST

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० ...

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० टक्क्यांपर्यंतच पेर गेली आहे. तरीही एकाही प्रमुख पिकाची पेरणी १०० टक्के झालेली नाही. तर गतवर्षी आतापर्यंत ९८ टक्क्यांपर्यंत पेरणी पोहोचली होती. दरम्यान, यंदा उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख हेक्टरपर्यंत असते. यानंतर रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. यंदाच्या हंगामात २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र आहे. तर गहू ३७ हजार ३७४ हेक्टर, मका १० हजार हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस आदींचे क्षेत्र अत्यल्प आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तरीही ८० टक्क्यांवरच पेरणी झालेली आहे. १ लाख ७१ हजार हेक्टरवर पिके आहे. तर फक्त मका पिकाची पेरणी १३८ टक्क्यांपर्यंत झालेली आहे.

रब्बीत ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यामध्ये माण तालुक्यात ३८ हजार हेक्टरवर असून खटाव तालुक्यात २० हजार हेक्टर, फटलण तालुका १८ हजार ४०६, कोरेगाव १३ हजार ५००, सातारा तालुका ९ हजार ५३०, पाटण ९ हजार १७६, खंडाळा ८ हजार ४६८ हेक्टर असून महाबळेश्वर वगळता इतर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. यंदा ज्वारीची पेरणी फक्त ७५.७६ क्षेत्रावर झालेली आहे. १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावरच ज्वारी आहे. तर सातारा तालुक्यातच १०० टक्क्यांवर ज्वारी पेर आहे. गव्हाची ३२ हजार हेक्टरवर पेर आहे.टक्केवारीत हे प्रमाण ८६ टक्क्यांवर आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सुमारे ६ हजार हेक्टर, पाटण ५ हजार हेक्टर, फलटण ७ हजार हेक्टर, खंडाळा २ हजार ६७५ हेक्टर, वाई तालुका २ हजार ६३१, सातारा २ हजार ८२२ हेक्टर, कोरेगाव १ हजार ६३७ हेक्टर, खटाव १ हजार ५३४ हेक्टर आणि माण तालुक्यात १ हजार २५४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ज्वारीप्रमाणे गहू क्षेत्र पेरणीतही यंदा घट झालेली आहे.हरभऱ्याची २० हजार ७०३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. कऱ्हाड तालुक्यात ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर कोरेगाव तालुक्यात २ हजार ७६९ हेक्टर, खटाव २ हजार ७४९ हेक्टर, फलटण २ हजार ५७५ हेक्टर अशी पेर आहे. पाऊस कमी पडल्याने सर्वच प्रमुख पिकांची पेरणी कमी झालेली आहे. तसेच आगामी काळात पिकांना पाणीही कमी पडणार आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा १० हजार हेक्टवर क्षेत्र होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका पीक घेण्यात आले आहे. पेरणीची टक्केवारी १३८ टक्के इतकी आहे.

सातारा तालुक्यातच १०० अन् माणमध्ये अवघी ६५ टक्के पेर..रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात सर्वाधिक आहे. तरीही येथे आतापर्यंत ३० हजार हेक्टरवर पिके घेण्यात आलेली आहे. अवघ्या ६५ टक्के क्षेत्रावरही पेर झालेली आहे. तर सातारा तालुक्यात १०३ टक्के पेरणी झालेली आहे. १५ हजार ४९२ हेक्टरवर पिके आहेत. कऱ्हाड तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून महाबळेश्वरला ९६.८५ टक्के, फलटण ८७ टक्के, खंडाळा ८०, वाई ८४, पाटण ८८.५१, जावळी ७९, कोरेगाव ७४, खटाव तालुक्यात ७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ