शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

रब्बीवरही दुष्काळी सावट; सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ८० टक्केच पेरणी  

By नितीन काळेल | Updated: January 8, 2024 19:11 IST

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० ...

सातारा : जिल्ह्यात मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने रब्बी पेरणीवरही परिणाम झाला आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात असताना आतापर्यंत ८० टक्क्यांपर्यंतच पेर गेली आहे. तरीही एकाही प्रमुख पिकाची पेरणी १०० टक्के झालेली नाही. तर गतवर्षी आतापर्यंत ९८ टक्क्यांपर्यंत पेरणी पोहोचली होती. दरम्यान, यंदा उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. या हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख हेक्टरपर्यंत असते. यानंतर रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. यंदाच्या हंगामात २ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र निश्चीत करण्यात आले होते. यामध्ये ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र आहे. तर गहू ३७ हजार ३७४ हेक्टर, मका १० हजार हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस आदींचे क्षेत्र अत्यल्प आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तरीही ८० टक्क्यांवरच पेरणी झालेली आहे. १ लाख ७१ हजार हेक्टरवर पिके आहे. तर फक्त मका पिकाची पेरणी १३८ टक्क्यांपर्यंत झालेली आहे.

रब्बीत ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यामध्ये माण तालुक्यात ३८ हजार हेक्टरवर असून खटाव तालुक्यात २० हजार हेक्टर, फटलण तालुका १८ हजार ४०६, कोरेगाव १३ हजार ५००, सातारा तालुका ९ हजार ५३०, पाटण ९ हजार १७६, खंडाळा ८ हजार ४६८ हेक्टर असून महाबळेश्वर वगळता इतर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र कमी आहे. यंदा ज्वारीची पेरणी फक्त ७५.७६ क्षेत्रावर झालेली आहे. १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावरच ज्वारी आहे. तर सातारा तालुक्यातच १०० टक्क्यांवर ज्वारी पेर आहे. गव्हाची ३२ हजार हेक्टरवर पेर आहे.टक्केवारीत हे प्रमाण ८६ टक्क्यांवर आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सुमारे ६ हजार हेक्टर, पाटण ५ हजार हेक्टर, फलटण ७ हजार हेक्टर, खंडाळा २ हजार ६७५ हेक्टर, वाई तालुका २ हजार ६३१, सातारा २ हजार ८२२ हेक्टर, कोरेगाव १ हजार ६३७ हेक्टर, खटाव १ हजार ५३४ हेक्टर आणि माण तालुक्यात १ हजार २५४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ज्वारीप्रमाणे गहू क्षेत्र पेरणीतही यंदा घट झालेली आहे.हरभऱ्याची २० हजार ७०३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. कऱ्हाड तालुक्यात ३ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर कोरेगाव तालुक्यात २ हजार ७६९ हेक्टर, खटाव २ हजार ७४९ हेक्टर, फलटण २ हजार ५७५ हेक्टर अशी पेर आहे. पाऊस कमी पडल्याने सर्वच प्रमुख पिकांची पेरणी कमी झालेली आहे. तसेच आगामी काळात पिकांना पाणीही कमी पडणार आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा १० हजार हेक्टवर क्षेत्र होते. प्रत्यक्षात १४ हजार हेक्टरवर मका पीक घेण्यात आले आहे. पेरणीची टक्केवारी १३८ टक्के इतकी आहे.

सातारा तालुक्यातच १०० अन् माणमध्ये अवघी ६५ टक्के पेर..रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात सर्वाधिक आहे. तरीही येथे आतापर्यंत ३० हजार हेक्टरवर पिके घेण्यात आलेली आहे. अवघ्या ६५ टक्के क्षेत्रावरही पेर झालेली आहे. तर सातारा तालुक्यात १०३ टक्के पेरणी झालेली आहे. १५ हजार ४९२ हेक्टरवर पिके आहेत. कऱ्हाड तालुक्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून महाबळेश्वरला ९६.८५ टक्के, फलटण ८७ टक्के, खंडाळा ८०, वाई ८४, पाटण ८८.५१, जावळी ७९, कोरेगाव ७४, खटाव तालुक्यात ७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ