शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे मतदार निघाले पर्यटनाला; ‘अर्ज मागे’चा भोपळा

By admin | Updated: April 15, 2015 23:59 IST

--सांगा डीसीसी कोणाची?

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने मतदारांना खूश ठेवण्याच्या असंख्य क्लृप्त्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील वजनदार नेते मंडळींनी आपल्या मतदारांना ‘कन्याकुमारी अन् तिरुपती’सह दक्षिण भारताच्या पर्यटनाला धाडल्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कऱ्हाड, पाटण, माण व जावळी तालुका सोसायटी मतदारसंघांत संघर्ष अटळ असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातही जोरदार चढाओढ असून, याठिकाणीही रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अवघ्या २१ जागांसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज छाननीत वैध ठरले असून, अर्ज मागे घेण्याच्या पाचव्या दिवशीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप आठ दिवसांची मुदत असल्याने मिळालेल्या कालावधीत हात ओले करून घेण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. ‘इच्छा माझी पुरी करा,’ असाही हेका काही जणांनी लावून धरल्याने निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या ‘वजनदार’ असामींना नाइलाजानं खर्च करून त्यांना पर्यटनाला पाठवावे लागले आहे. जावळी-कोरेगावातील काही मंडळी लांब दौऱ्यावर गेल्याची खबरबात आहे. या दौऱ्यात केवळ अंगावरील कपड्यानिशी यायचे, बाकी सर्व काही आधीच नियोजनबद्ध केलेले आहे, असे सांगण्यात आल्याने पर्यटनाला गेलेल्यांची चांदी झाली आहे. त्यांच्या या दौऱ्याची बातमी समजलेले सामान्य सभासद मात्र त्यांचा हेवा करताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्ज मागे घेतले जातील; मात्र त्यासाठी २२ तारीख उजाडावी लागेल. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी जास्त जागा बिनविरोध होतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)आमदारांवर जबाबदाऱ्याजिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाच्या आमदारांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून, त्या-त्या मतदारसंघात ठिय्या मांडला आहे. ...खंडाळा विश्रामगृहावर अजित पवारांची बैठकसोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी विश्रामगृहावर गुप्त बैठक घेऊन जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटीलही उपस्थित होते. जावळीतले ३४ मतदार गायबजावळी विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ३४ मतदार अचानकपणे गायब झाले आहेत. ही सर्व मंडळी दौऱ्यावर गेल्याची तालुक्यात चर्चा आहे; परंतु नेमक्या कुठल्या पर्यटनस्थळी ही मंडळी गेली आहेत, याचा शोध अनेकजण घेत आहेत.