शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:43 AM

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त ...

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त समित्या या राहिलेल्याच नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज होत नसल्याने तंटामुक्त झालेल्या गावांतील तंटेही आता पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. यावरून तंटामुक्त समित्या किती फायदेशीर ठरतात हे यावरून सिद्ध होते.

नजर आकडेवारीवर...

तंटामुक्त समित्या...

माण ४१

खटाव ५५

कोरेगाव ५८

फलटण ६२

कऱ्हाड ६५

...............................

समित्या नावालाच...

- अनेक गावांत तंटामुक्त समित्या या नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण, ग्रामपंचायतीत सत्ता ज्यांची असते. त्याच गटाचा समितीचा अध्यक्ष बहुतांशी ठिकाणी असतो. त्यातच गावांतील राजकारण टोकाचे असेल तर अशा समित्या या वाद मिटविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आलेले आहे.

- ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायती असतात. तशाच ४, ५ हजार मतदार असणाऱ्याही आहेत. अशा ठिकाणी वाद अधिक राहतात. त्यामुळे वाद कमी होत नाहीत, तसेच ते सुटलेही जात नाहीत, हे वास्तव आहे.

..............................................

निवडणूक झालेल्या ठिकाणी समितीच नाही...

ग्रामपंचायत निवडणूक झाली की ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करण्यात येते; पण जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैअखेर ८७९ ग्रामपंचायतींची निवडणूक झालेली आहे. कोरोनामुळे सध्या ग्रामसभाच घेता येत नाही. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावांत तंटामुक्त समिती अस्तित्वातच नाही, तर जिल्ह्यातील जवळपास १५ ते २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

................................................