शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आघाडीच्या राजकारणात काँग्रेस कार्यकर्त्यांची फरफट - भाई जगताप

By दीपक देशमुख | Updated: August 12, 2023 18:03 IST

मणिपूर अत्याचाराबाबत स्मृती इराणी गप्प

सातारा : आघाडीच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची गेल्या वीस वर्षांत फरफट झाली आहे. परंतु, सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीतील घटक म्हणून चर्चेला बसल्यावर पक्षाची भुमिका मांडणार असे प्रतिपादन मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी केले. काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव ॲड. उदय पाटील-उंडाळकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाई जगताप म्हणाले, सातारा लोकसभेच्या आढावा घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आघाडीच्या राजकारणात तडजोड करताना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. आम्ही महाविकास आघाडीतच असून एकत्रच लढणार आहोत. पण काँग्रेस म्हणूनही आमचेही अस्तित्व आहे. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भुमिकांही मांडणार असल्याचे जगताप म्हणाले. जिल्ह्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. परंतु, त्यावेळी खा. शरद पवार यांची राष्ट्रवादी होती. पण आजच्या घडीला खुद्द खासदार श्रीनिवास पाटील हेही ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहे, हे सांगू शकणार नसल्याचे सांगत सातारा लाेकसभेच्या उमेदवार निवडीवेळी काँग्रेसचाही दावा राहणार असल्याचे संकेत दिले.

मणिपूर अत्याचाराबाबत स्मृती इराणी गप्पकाँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्याबाबत स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य लज्जास्पद आहे. मणिपूर येथे महिलांची धिंड काढली गेली, अत्याचार झाले. महिला क्रीडापटूंवर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री अन्याय करतो, याबाबत चित्रा वाघ, स्मृती इराणी आदींनी ब्र काढला नाही. अशावेळी छप्पन इंची छाती काय करते असा सवाल जगताप यांनी करून सोशल मिडियावर मोदींची खुशमस्करी टीम केवळ त्यांना खुश करण्याचे काम करते, देशाच्या स्थितीचे काही पडले नसल्याची टिका केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगताप