शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आघाडीच्या राजकारणात काँग्रेस कार्यकर्त्यांची फरफट - भाई जगताप

By दीपक देशमुख | Updated: August 12, 2023 18:03 IST

मणिपूर अत्याचाराबाबत स्मृती इराणी गप्प

सातारा : आघाडीच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची गेल्या वीस वर्षांत फरफट झाली आहे. परंतु, सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीतील घटक म्हणून चर्चेला बसल्यावर पक्षाची भुमिका मांडणार असे प्रतिपादन मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी केले. काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश सचिव ॲड. उदय पाटील-उंडाळकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाई जगताप म्हणाले, सातारा लोकसभेच्या आढावा घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आघाडीच्या राजकारणात तडजोड करताना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. आम्ही महाविकास आघाडीतच असून एकत्रच लढणार आहोत. पण काँग्रेस म्हणूनही आमचेही अस्तित्व आहे. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भुमिकांही मांडणार असल्याचे जगताप म्हणाले. जिल्ह्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. परंतु, त्यावेळी खा. शरद पवार यांची राष्ट्रवादी होती. पण आजच्या घडीला खुद्द खासदार श्रीनिवास पाटील हेही ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहे, हे सांगू शकणार नसल्याचे सांगत सातारा लाेकसभेच्या उमेदवार निवडीवेळी काँग्रेसचाही दावा राहणार असल्याचे संकेत दिले.

मणिपूर अत्याचाराबाबत स्मृती इराणी गप्पकाँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्याबाबत स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य लज्जास्पद आहे. मणिपूर येथे महिलांची धिंड काढली गेली, अत्याचार झाले. महिला क्रीडापटूंवर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री अन्याय करतो, याबाबत चित्रा वाघ, स्मृती इराणी आदींनी ब्र काढला नाही. अशावेळी छप्पन इंची छाती काय करते असा सवाल जगताप यांनी करून सोशल मिडियावर मोदींची खुशमस्करी टीम केवळ त्यांना खुश करण्याचे काम करते, देशाच्या स्थितीचे काही पडले नसल्याची टिका केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगताप