शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवरील शिक्के उठविण्यासाठी दिरंगाई : खंडाळ्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:45 IST

खंडाळा : तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्र. ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून केवळ दिरंगाई केली जात आहे.

खंडाळा : तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्र. ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून केवळ दिरंगाई केली जात आहे. वास्तविक, एमआयडीसी प्राधिकरणाने वारंवार बैठका घेऊन शेतकºयांना आश्वासने दिली. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात शिक्के काढण्याबाबत शेतकºयांना कोलदांडा देण्यात आला असून, याबाबत प्रशासनही वर्षभरापासून शांत आहे.

शेतकºयांना शासन व प्रशासनाने वाºयावर सोडल्याची भावना उमटू लागली आहे. हरकती दाखल केलेल्या शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के तातडीने न उठविल्यास शेतकरी बचाव कृती समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. खंडाळा तालुक्यात एमआयडीसी टप्पा क्र. ३ मध्ये शिवाजीनगर, भादे, अहिरे, म्हावशी, बावडा, खंडाळा, मोर्वे या सात गावांतील सुमारे १८३२ हेक्टर म्हणजेच जवळपास ४५०० एकर जमीन नीरा-देवघर कालव्याच्या लाभक्षेत्रातील जमीन संपादित करण्याचा प्रयत्न २०१० पासून सुरू आहे. त्यापैकी भांडवलदार, मोठे बिल्डर आणि अनेक राजकीय वरदहस्त असलेल्यांच्या सुमारे १५० हेक्टर जमिनी विनाअधिसूचित केल्याचा आरोप होत आहे. गुंतवणूकदारांच्या गवतपड माळपड जमिनी एमआयडीसीने सोडल्यात आणि गरीब शेतकºयांच्या बागायती झालेल्या जमिनी हरकत देऊन देखील सुटकेची वाट पाहत आहेत.

गेल्यावर्षी मंत्रालयामध्ये एमआयडीसी अंधेरी कार्यालयात शेतकरी, अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या टप्प्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांच्या जमिनीवरील शिक्के काढले असल्याचे अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दहा एकर जमिनीचे शिक्के काढल्याचे ताजे प्रकरण दाखवून दिले. शेतकºयांचा विरोध असल्यास जमीन संपादित केली जाणार नाही, असेदेखील स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात भूमिअभिलेख कक्षाकडून तातडीची मोजणी प्रक्रिया चालू करून जमिनींची स्थळ पाहणी करून त्यासाठी एमआयडीसीकडून संयुक्त मोजणी व कार्यवाही करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला असल्याचा आरोप होत आहे.हरकतींची प्रक्रियाही थंडावली...खंडाळा तालुक्यातील ९० खातेदारांना सुनावणीच्या नोटिसा बाजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७० खातेदारांनी सुनावणीमध्ये आपली हरकत नोंदवली. १५ खातेदार गैरहजर राहिले. ज्या खातेदारांना सुनावणीस हजर राहता आले नाही. त्यांनी फलटण प्रांत कार्यालयात आपले हरकत अर्ज दाखल केले होते. मात्र ही सर्वच प्रक्रिया ठप्प असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

जमिनी देणाºया गुंतवणूकदार व शेतकरी यांच्या जमिनी असलग आहेत. शेतकºयांनी हरकती देऊनही प्रशासकीय यंत्रणा चुकीचे करत आहे. या प्रक्रियेबाबत शेतकºयांना अंधारात ठेवले जात आहे. शासन शेतकºयांची फसवणूक करीत आहे. आता शेतकºयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे.-तेजस भोसले,समन्वयक शेतकरी कृती समिती.