शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus : महामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 1:48 PM

कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

ठळक मुद्देमहामारीच्या प्रादुर्भावात विम्याचा आधार!सरपंचांना दिलासा : सातारा जिल्ह्यातील १४०० सरपंचांना लाभ

सातारा : कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे.कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये गावपातळीवर ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. शासनाने दिलेल्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे. परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना नियमांची अंमलबजावणी करत विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम ग्रामसमित्या करत आहेत. त्यामुळे ग्रामसमितीचे अध्यक्ष असणारे सरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लोक त्यांच्या थेट संपर्कात येत असतात. यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.या मागणीची दखल सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली. या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचांचा ५० लाखांचा विमा या माध्यमातून निघणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स, संगणक आॅपरेटर, नर्सेस यांना देखील शासनाने प्रत्येकी २५ लाखांचे विमा कवच दिले असल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीशी लढत असताना सरपंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

गावाबाहेरून आलेल्या लोकांशी त्यांचा निकटचा संपर्क येत होता. जिल्ह्यात जे कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ९० टक्के लोक हे मुंबई, ठाणे, पुणे येथून प्रवास करून आलेले लोक आहेत. त्यामुळे सरपंचांना कोरोनाची व्याधी होण्याची शक्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर विमा कवच मिळाल्याने सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. सरपंच परिषदेच्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिला आहे.-जितेंद्र भोसले, खजिनदार, सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर