शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:36 IST

कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोना गो... : लढ्यात जनताच आखाड्यातसवयभानतर्फे बंदचे आवाहन

सागर गुजरसातारा : कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये जावळी, वाई, कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर या परिसरामध्ये जनतेने कर्फ्यू पुकारला. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून जनता आता स्वत:हून बंद पुकारण्याच्या मानसिकतेत आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेलेला आहे. शेकडो लोक आपला प्राण गमावून बसलेले आहेत. घरातील चालती-बोलती माणसे कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडत आहेत. तर कोरोनाबाधित झालेली कुटुंबे अक्षरश: तडफडताना पाहायला मिळतात.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असली तरीदेखील रुग्णालयांमधील बेडची संख्या अपुरी पडत आहे. आॅक्सिजनचे प्रमाण कमी आहे. व्हेंटिलेटर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे.

धनदांडग्यांनी काही रुग्णालयांमध्ये बेड बळकावले आहेत, त्यामुळे जे गरजवंत लोक आहेत आणि अंतिम वेळी त्यांना आॅक्सीजन, रेडमीसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर याची गरज पडते. ऐनवेळी हे मिळत नसल्याने देखील लोक मृत्युमुखी पडत आहेत.

हे चित्र समोर दिसत असल्याने जिल्ह्यातील नागरिक अधिकच दक्ष झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सवयभान अभियानाचे प्रवर्तक राजेंद्र चोरगे यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे आवाहन करण्यात आले आहे.

शेजारच्या सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू सुरु असताना साताऱ्यातील प्रशासनाने आवाहन न करता देखील जनताच कर्फ्यूसाठी पुढाकार घेताना दिसते.लॉकडाऊन गरजेचाकोरोनाची साखळी तोडणं गरजेचे आहे. साताऱ्याच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक वाटते. सध्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, पितृपंधरवडा सुरु असल्याने व्यवसाय बंद ठेवले तर नुकसान होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे आवाहन सवयभानतर्फे केले आहे.जनतेलाच हवाय बंद..सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन सुरू असताना प्रशासनाची नजर चुकवून लोक रस्त्यावर येत होते. आता कोरोनाने कहर माजवल्याने जनताच सावधगिरीच्या तयारीत आहे, असे मत नगरसेवक धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यात यानंतरच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी आहे. गोरगरिबांचा त्रास कमी करायचा असेल तर चेन तोडावी लागणार आहे.- राजेंद्र चोरगे

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसर