शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus Unlock: कोरोना गो... लढ्यात जनताच आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:36 IST

कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोना गो... : लढ्यात जनताच आखाड्यातसवयभानतर्फे बंदचे आवाहन

सागर गुजरसातारा : कोरोनाची महामारी जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली आहे. ही महामारी रोखण्यासाठी प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी देखील आता जनतेचेही ही प्रशासनाला साथ मिळू लागली आहे. प्रशासनाने कोणतेही आवाहन न करताच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यामध्ये जावळी, वाई, कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर या परिसरामध्ये जनतेने कर्फ्यू पुकारला. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढू लागला असल्याने सावधगिरीची उपाययोजना म्हणून जनता आता स्वत:हून बंद पुकारण्याच्या मानसिकतेत आहे.कोरोनाबाधितांचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेलेला आहे. शेकडो लोक आपला प्राण गमावून बसलेले आहेत. घरातील चालती-बोलती माणसे कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडत आहेत. तर कोरोनाबाधित झालेली कुटुंबे अक्षरश: तडफडताना पाहायला मिळतात.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असली तरीदेखील रुग्णालयांमधील बेडची संख्या अपुरी पडत आहे. आॅक्सिजनचे प्रमाण कमी आहे. व्हेंटिलेटर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे.

धनदांडग्यांनी काही रुग्णालयांमध्ये बेड बळकावले आहेत, त्यामुळे जे गरजवंत लोक आहेत आणि अंतिम वेळी त्यांना आॅक्सीजन, रेडमीसीवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर याची गरज पडते. ऐनवेळी हे मिळत नसल्याने देखील लोक मृत्युमुखी पडत आहेत.

हे चित्र समोर दिसत असल्याने जिल्ह्यातील नागरिक अधिकच दक्ष झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सवयभान अभियानाचे प्रवर्तक राजेंद्र चोरगे यांनी नागरिकांना लॉकडाऊनचे आवाहन करण्यात आले आहे.

शेजारच्या सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू सुरु असताना साताऱ्यातील प्रशासनाने आवाहन न करता देखील जनताच कर्फ्यूसाठी पुढाकार घेताना दिसते.लॉकडाऊन गरजेचाकोरोनाची साखळी तोडणं गरजेचे आहे. साताऱ्याच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक वाटते. सध्या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, पितृपंधरवडा सुरु असल्याने व्यवसाय बंद ठेवले तर नुकसान होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे आवाहन सवयभानतर्फे केले आहे.जनतेलाच हवाय बंद..सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन सुरू असताना प्रशासनाची नजर चुकवून लोक रस्त्यावर येत होते. आता कोरोनाने कहर माजवल्याने जनताच सावधगिरीच्या तयारीत आहे, असे मत नगरसेवक धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यात यानंतरच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या कमी आहे. गोरगरिबांचा त्रास कमी करायचा असेल तर चेन तोडावी लागणार आहे.- राजेंद्र चोरगे

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSatara areaसातारा परिसर