शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Corona Cases In Satara : कागदावर काम नको गावागावात पोहचवा : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 18:05 IST

Corona Cases In Satara : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत गेला पण लोकांना योग्य उपचार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची आकडेवारी कमी येत असताना खंडाळा तालुक्याचा आकडा का कमी होत नाही ही मोठी खंत आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष गावागावात पोहचून गावात येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देकागदावर काम नको गावागावात पोहचवा : मकरंद पाटीलखंडाळा तहसील कार्यालयात कोरोना आढावा बैठक

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत गेला पण लोकांना योग्य उपचार देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. मात्र जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची आकडेवारी कमी येत असताना खंडाळा तालुक्याचा आकडा का कमी होत नाही ही मोठी खंत आहे . कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष गावागावात पोहचून गावात येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.आ. पाटील म्हणाले, खंडाळा तहसील कार्यालयात तालुक्याच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ , तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, डॉ. रवींद्र कोरडे, मुख्याधिकारी परदेशी यांसह अधिकारी उपस्थित होते .तालुक्यातील शिरवळ, लोणंद, शिंदेवाडी यांसह काही गावातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. तालुक्यातील पॉझिटिव्ह दर कमी होत नाही हे दुर्दैव आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहून काम करायला हवे. लोकांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही . प्रत्येक गावात सुरु केलेल्या विलगीकरण कक्षाकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा.

आगामी काळात तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे . त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र त्यासाठी प्रशासनाने झोकून देऊन काम करायला हवे.पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षरवळमध्ये कोरोना काळात गटविकास अधिकारी यांनी ग्राम समितीची एकही बैठक घेतली नाही. त्यांचे ग्रामसेवक काय काम करतात याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली जात नाही. शिरवळच्या कोरोना प्रसाराला पोलीस यंत्रणाही कारणीभूत आहे. त्यांची कामात टाळाटाळ असते. कंपनी कामगारांची चोख तपासणी करण्यात यंत्रणा फोल ठरली आहे असे ताशेरे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी ओढले. याबाबत योग्य ती कार्यवाही करून खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार मकरंद पाटील यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटील