शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

..त्यामुळे राहुल गांधी यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही - उदयनराजे भोसले 

By सचिन काकडे | Updated: November 7, 2024 17:27 IST

..तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो

सातारा : छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसं लोकशाहीच्या प्रक्रियेत आली तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या निवासस्थानी गुरुवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्म समभाव ही शिकवण त्यांनी दिली. घरोघरी त्यांना दैवत म्हणून पूजले जाते. असे असताना भ्रमिष्ट व क्रियानिष्ठ असलेल्या राहुल गांधी यांनी शिवरायांबद्दल समाज माध्यमांवर मांडलेले मत अत्यंत निंदनीय आहे.

ज्यांना युगपुरुषांची कोणतेही माहिती नाही, स्वतःची विचारधारा नाही असा व्यक्ती एखाद्या पक्षाचे नेतृत्व कसे काय करू शकतो? अशा व्यक्तींना महाराष्ट्र व देशाच्या जनतेने धडा शिकवावा, कारण असाच पायंडा जर पुढे पडत गेला तर तो देशासाठी हितकारी ठरणार नाही. 

राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारया संदर्भात संपूर्ण माहितीची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. या वक्तव्याचा सर्व पातळीवर निषेध झाला पाहिजे. दरम्यान, महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत कठोर कायदा करावा, अशी मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRahul Gandhiराहुल गांधीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024