शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

निपाहच्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 7:09 PM

CoronaVirus Satara : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परिसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला या दाव्याबाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनिपाहच्या दाव्याने महाबळेश्वरमध्ये संभ्रमतालुक्यात एकही रुग्ण नाही : शास्त्रज्ञांच्या दाव्याबाबत शंका

अजित जाधवमहाबळेश्वर : निपाह व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला एकही रूग्ण महाबळेश्वर परिसरात नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी केलेला या दाव्याबाबत शहरातून शंका व्यक्त केली जात आहे.महाबळेश्वरपासून दहा किलोमीटर अंतरावर मालुसरवाडी हे गाव आहे. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर ह्यरॉबर्स केव्हह्ण नावाची गुहा आहे. याला स्थानिक भाषेत सीमसीम घळ असेही संबोधले जाते. या गुहेत अनेक वर्षांपासून वटवाघळांची वसाहत आहे. वटवाघळांच्या अनेक जाती आहेत; परंतु या गुहेतील वटगाघळ अत्यंत दुर्मिळ आहेत.

मार्च २०२० मध्ये पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांचे नमुने गोळा केले. यावर संशोधन करून त्यांनी त्याचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे. या अहवाला नुसार महाबळेश्वरच्या गुहेर असलेल्या दोन वटवाघळांमध्ये निपाह हा अतिघातक व्हायरस सापडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.निपाह हा व्हायरस कोरोना पेक्षा अधिक घातक आहे. कारण कोरोनाचा मृत्यु दर हा दोन टक्के तर निपाहचा मृत्यू दर हा ६५ ते १०० टक्के आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या वृत्तांचे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्या प्रमाणे वटवाघळाते निपाह हा व्हायरस असला तरी या व्हायरसचा प्रादुर्भाव स्थानिक लोकांना कधीच झाला नाही.

निपाह या विषाणुची लक्षणे असलेला रूग्ण या भागात कधी आढळला नाही. ज्या कोरोनाने जगात थैमान मांडले आहे त्या कोरोनाची लागण देखील या गुहेजवळ असलेल्या मालुसर गावातील एकाही व्यक्तीला झाली नाही. असा दावा या गावचे जेष्ठ नागरिकव माजी सरपंच इक्बाल मुलाणी यांनी केला... तर गुहा बंद कराकोरोनामुळे महाबळेश्वरची आर्थिक घडी अगोदरीच विस्कटली आहे. त्यातच निपाह विषाणूमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्याची सत्यता पुन्हा तपासून यामध्ये सत्यता असेल तर ती गुहा कायमची बंद करावी, विषाणूा गुहेतून बाहेर येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर