शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सातारा लोकसभेचा तिडा; दादांच्या इच्छेवर मिठाचा खडा

By नितीन काळेल | Updated: December 11, 2023 19:34 IST

महायुतीत सर्वच कंबर कसून; डाळ शिजणार कोणाची?

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा अवधी असलातरी साताऱ्यात आघाडीतून राष्ट्रवादी लढणार निश्चित आहे. पण, महायुतीतील सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. आधी अजित पवार यांनी नंतर शिवेसेनेने आणि आता भाजपनेही दावा ठोकलाय. त्यामुळे युतीत तिढा वाढला असून अजितदादांच्या इच्छेवर मिठाचा खडा पडला आहे. यातून कोणाची डाळ शिजणार हे निवडणुकीत समजणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघावर पूर्वीपासून काॅंग्रेसचे वर्चस्व राहिले. १९९९ पर्यंतचा इतिहास पाहता शिवसेनेचा उमेदवार एकदाच निवडून आला. पण, याचवेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा शरद पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे मागील पाच निवडणुकीत राष्ट्रवादीचाच खासदार झाला. पण, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळालीय. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले. सेनापती दुसऱ्या पक्षात गेले. तसेच काॅंग्रेसमध्येही वाताहत झाली. अनेकांनी कमळ जवळ केले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली. यातूनच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर पुन्हा-पुन्हा दावा ठाेकलाय. त्यामुळे महायुतीत साताऱ्याचा गुंता वाढतच चालला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सातारा लोकसभा निवडणूक लढविणार असे जाहीर केले. त्यानंतर काहीच दिवसात शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही साताऱ्यावर दावा केला. तर आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही साताऱ्याची निवडणूक लढविण्याचे रणशिंग फुंकले. यामुळे युतीत तिढा निर्माण झाला आहे. अजित पवार यांना जिल्ह्यात पक्षाची ताकद असल्याने सातारा मतदारसंघ हवा आहे. त्यातच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची ताकदही असल्याने आपल्या उमेदवाराला निवडूण येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत हेही माहीत आहे. त्यामुळे पवार यांचा दावा योग्य ठरतो.पण, शिवसेनेला हा मतदारसंघ ताब्यात ठेवायचा आहे. युतीत पहिल्यापासून मतदारसंघ सेनेकडेच राहिलाय. आताही सेनेचे दोन आमदार मतदारसंघात आहेत. सोबत भाजपची ताकद आहे. त्यामुळे सेनेलाही मतदारसंघात बाणाला ताण द्यायचा आहे. यासाठी पुरूषोत्तम जाधव उमेदवार म्हणून दावा ठोकतील. यापूर्वीही त्यांनी लोकसभा निवडणूक लढविलेली आहे. त्यातूनच त्यांनी साताऱ्यावर आमचा हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपची गेल्या दोन वर्षातील आक्रमक भूमिका पाहता त्यांनाही सातारा मतदारसंघ हवा आहे. भाजपने तळागाळात पक्ष नेलाय. त्यामुळे युतीत उमेदवार निवडूण येऊ शकतो असा आशावाद त्यांच्याकडे आहे. त्यातच या मतदारसंघात मागील वर्षभरात दोन केंद्रीयमंत्र्यांचा दोन-तीन दिवसांचा दाैरा झाला. ही सर्व पेरणी लोकसभा निवडणुकीसाठीच होती. त्यामुळे महायुतीत जिल्हा पातळीवरतरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र नाही. त्यामुळे याचे पडसाद आगामी काळात उमटणार निश्चित आहे. यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम दावा केला असलातरी शिवसेना आणि भाजप माघार घेणार का ? हा कळीचा मुद्दा ठरला आहे.आघाडी एकत्र; युतीत ताळमेळ लागणे कठीण..महाविकास आघाडीत काॅंग्रेसने निवडणुकीची तयारी केली आहे. फुटीनंतर राष्ट्रवादी मागे होती. पण, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. आघाडीत मतदारसंघ कोणाकडे अजून स्पष्ट नसताना सर्वजण एकत्र आल्याने एकी दिसून आली. पण, युतीत तिघेही जण मतदारसंघावर दावा करत आहेत. यामुळे आघाडी एकत्र आली असलीतरी युतीत ताळमेळ लागणे कठीण आहे.

..तर युतीत एकदिलाने काम नाही; माढाही चर्चेला येणार?

साताऱ्यावरुन अजित पवार हे मागे हटतील असे सध्यातरी चित्र नाही. त्यामुळे युतीत नाईलाजास्तव का असेना राष्ट्रवादीला मतदारसंघ मिळेल. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते केंद्रात सत्ता आणायची म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करतील. पण, नाराज शिवसेना कितपत साथ देईल, याविषयी साशंकता राहू शकते. तसेच अजित पवार यांच्या ताब्यातून सातारा निसटला तर माढ्यावर नक्कीच त्यांचा दावा असणाार आहे. याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचीच ताकद आहे. सेनेसाठी माढा फायद्याचा नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा