शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे खरिपाची चिंता..पूर्व भागात नापिकीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:13 IST

आता तर जुलै महिना संपत आला तरी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली नाही. याला कारण म्हणजे उशिरा आलेला पाऊस आणि आता पावसाने मारलेली दडी.

ठळक मुद्देबाजरीची ४६ टक्केच पेरणी; अद्यापही जिल्ह्यात ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना

नितीन काळेल ।सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी उशिराने सुरू झाली असली तरी आता पावसानेच दडी मारली आहे. त्यामुळे पेरणीवर याचा परिणाम झाला आहे. जुलै संपत आला तरी आतापर्यंत बाजरीची फक्त ४६ टक्केच पेरणी झाली असून, अद्यापही जिल्ह्यातील सर्व पिकांचे मिळून ९२ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली येणे बाकी आहे. सध्या पश्चिमेकडील पेरणीने वेग घेतलाय.

सातारा जिल्ह्यात बहुतांशी वेळा दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यापूर्वी वळवाचा आणि मान्सून पूर्व पाऊस होतो; पण यंदा उन्हाळ्यात एकही वळवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची मशागत करता आली नाही. तर मान्सूनचा पाऊस १५ दिवस उशिरा सुरू झाला. यामुळे शेतीची पेरणीपूर्व कामेही पूर्ण करता आली नाहीत. आता तर जुलै महिना संपत आला तरी खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली नाही. याला कारण म्हणजे उशिरा आलेला पाऊस आणि आता पावसाने मारलेली दडी.

पूर्व भागात सुरुवातीच्या काळात पाऊस झाला होता. काही ठिकाणी चांगला बरसला तर अनेक ठिकाणी तोंड दाखवण्याचे काम पावसाकडून झाले. त्यामुळे ओल असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. ही पेरणी आश्वासक अशी नाही. तर पूर्वेकडे खरीप हंगामात बाजरीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत फक्त २२ हजार ९५८ हेक्टरवर पेरा झालाय. माणमध्ये २१ हजार ६७० पैकी ११ हजार ६४१ हेक्टरवर पेरणी झालीय. तर माण पाठोपाठ खटावमध्ये बाजरीचे क्षेत्र असते तेथेही १० हजार ६४५ पैकी ५ हजार ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोरेगावमध्ये सुमारे सव्वादोन हजार हेक्टरपैकी ८० हेक्टरवर पेरणी झालीय. जुलै महिना संपत आल्याने बाजरीची पेरणी होणे अवघड आहे.

पश्चिमेकडे मात्र पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या कामाला वेग आलाय. या भागात भात, सोयाबीन, नाचणी, तूर, उडीद, मका, भुईमूग अशी पिके घेण्यात येतात. या पिकांची पेरणी व लागण सुरू आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ७६ हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक सोयाबीनचे ५३ हजार ७५० हेक्टर असून, त्याखालोखाल भाताचे ५० हजार ८०५ तर बाजरीचे ४९ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यानंतर भुईमूग, ज्वारी पिकांचा समावेश आहे. १८ जुलैपर्यंत सोयाबीनची ४१ हजार ९७४ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ७८.०९ आहे. तर भाताची २५ हजार ४६५ हेक्टरवर पेरणी झाली असून, टक्केवारी ५० राहिलीय. सातारा, जावळी, पाटण, कºहाड, वाई तालुक्यांत भात लागण सुरू आहे. सोयाबीनची पेरणी अधिक करून सातारा, पाटण, कºहाड आणि कोरेगाव तालुक्यात झाली आहे. जिल्ह्णात भुईमुगाची पेरणी २८ हजार २३५ हेक्टरवर झाली असून, टक्केवारी ६९.८४ आहे.

आतापर्यंत भाताची लागण ५०.१२ टक्के क्षेत्रावर झाली आहे. तर ज्वारी ५९. ५६ टक्के, बाजारी ४६.३५, मका ४३.६५, नाचणी ६५.८२, तूर ५६.३६, उडीद ५४.६५, मूग ८०.३१, भुईमूग ६९.८४, तीळ ५१.६१, सूर्यफूल १६.८७, कारळा ४२.३९ टक्के अशी पेरणी झाली आहे.पूर्वेकडील हंगाम वाया जाणार...पूर्व भागातील शेतकºयांनी सुरुवातीच्या पावसावर बाजरीची पेरणी केली. आता पीक उगवून आलं असलंतरी पावसाने दडी मारलीय. त्यामुळे पीक वाळून जाऊ लागलं आहे. तर पाऊस होईल, या आशेवर काही शेतकरी पेरणी करण्यास थांबले होते. आता तर पाऊसच नसल्याने व जुलै महिना संपत आला असताना येथे पेरणी होणे शक्य नाही, त्यामुळे शेतकºयांना इतर पिकांकडे वळावे लागणार आहे.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंतची तालुकानिहाय झालेली पेरणी टक्केवारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीRainपाऊस