शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

केंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:36 IST

पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कºहाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचितभैरवगड, मोरेवाडीतील डोंगरांना तडे; स्थलांतराचा प्रश्न

सातारा : पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कऱ्हाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकात चित्तरंजन दास, आर. पी. सिंग, व्ही. पी. राजवेदी, मिलिंद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकारी व आयुक्त सुहास दिवशे, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांचा या पथकात सहभाग होता. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार होते.

सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, आबासाहेब पाटील, जिल्हा पदिषदेचे सदस्य प्रदीप पाटील, मंडलाधिकारी नवींद्र भांदिर्गे, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, तलाठी दराडे, पोलीस पाटील पवन गुरव यांनी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा तसेच पूरबाधित भागाची माहिती सांगितली.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली आहे. सातारा, वाई, पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे कोसळली. तर उरलेली घरे ही राहण्यासाठी सुरक्षित राहिलेली नाहीत.

या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्तांची घरे बांधून द्यावीत, अशी मागणी आहे. या लोकांच्या पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांची आर्थिक बाजू लंगडी झालेली आहे. ही बाजू सावरण्यासाठी केंद्रीय पथकाकडून वस्तुनिष्ठ अहवाल जाणे अपेक्षित आहे.केवळ तांबवेसारख्या एका गावात पाहणी करून संपूर्ण जिल्ह्याचा अंदाज बांधण्याचे काम झाल्यास नुकसानग्रस्तांवर अन्याय होणार आहे. सातारा जिल्ह्यात १० साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. कऱ्हाड तालुक्यात गुऱ्हाळ घरे आहेत, या माध्यमातून शेतकऱ्यांची व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांची उपजीविका सुरू आहे. केंद्रीय पथकातील तज्ज्ञ म्हणवून घेणारे अधिकारी शेतकºयांना उसाऐवजी भात पीक घ्या, असा सल्ला देताना दिसले.भात हे पीक जास्त पावसाच्या ठिकाणी येते. यावर्षी अतिवृष्टी झाली, पुढच्या वर्षी तेवढाच पाऊस होईल, असे नाही, त्यामुळे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेला हा अनाहूत सल्ला हास्यास्पद ठरला आहे.जिल्ह्यातील शेती, सार्वजनिक मालमत्ता, रस्ते यांचे नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. पाणी योजनांच्या विहिरीमध्ये गाळ साठला आहे. शेतीत पाणी साठून पिके वाया गेली आहेत. अजूनही ठिकठिकाणी पंचनाम्यासाठीही कोणी फिरकले नसल्याच्या शेतकºयांकडून तक्रारी येत आहेत.

अंगापूर परिसरात पंचनामे करण्याआधीच ६५ मिलिमीटर पावसाचा निकष लावला असल्याने शेतकरी मदत मिळेल का ? या चिंतेत आहेत. प्रशासनाचे पंचनामे म्हणजे रामायणातील वानराचे शेपूट असल्याची टीकाही होत आहे.भागाबाई शेलारांना न्याय मिळणार का?सातारा तालुक्यातील पाटेघर रोहोट भागात राहणाऱ्या भागाबाई आनंदा शेलार (वय ८९) ६ आॅगस्ट रोजी राहत्या घरात अंगावर भिंत पडून मृत्यू झाला होता. या घटनेचा पंचनामाही झाला. भागाबार्इंच्या कुटुंबीयांना अद्याप शासनाने कोणतीच मदत केलेली नाही. आपत्तीत मृत्यू झाल्यास शासनाकडून चार लाख रुपये मिळतात. या मदतीचे काय झाले? हा प्रश्न आहे.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर