शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:36 IST

पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कºहाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचितभैरवगड, मोरेवाडीतील डोंगरांना तडे; स्थलांतराचा प्रश्न

सातारा : पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कऱ्हाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरित करावी लागली. या गावांकडे केंद्रीय पथकाने पाठ फिरवली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकात चित्तरंजन दास, आर. पी. सिंग, व्ही. पी. राजवेदी, मिलिंद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकारी व आयुक्त सुहास दिवशे, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांचा या पथकात सहभाग होता. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार होते.

सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, आबासाहेब पाटील, जिल्हा पदिषदेचे सदस्य प्रदीप पाटील, मंडलाधिकारी नवींद्र भांदिर्गे, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, तलाठी दराडे, पोलीस पाटील पवन गुरव यांनी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा तसेच पूरबाधित भागाची माहिती सांगितली.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली आहे. सातारा, वाई, पाटण, कऱ्हाड, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे कोसळली. तर उरलेली घरे ही राहण्यासाठी सुरक्षित राहिलेली नाहीत.

या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्तांची घरे बांधून द्यावीत, अशी मागणी आहे. या लोकांच्या पिकांचे, शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांची आर्थिक बाजू लंगडी झालेली आहे. ही बाजू सावरण्यासाठी केंद्रीय पथकाकडून वस्तुनिष्ठ अहवाल जाणे अपेक्षित आहे.केवळ तांबवेसारख्या एका गावात पाहणी करून संपूर्ण जिल्ह्याचा अंदाज बांधण्याचे काम झाल्यास नुकसानग्रस्तांवर अन्याय होणार आहे. सातारा जिल्ह्यात १० साखर कारखाने आहेत. जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. कऱ्हाड तालुक्यात गुऱ्हाळ घरे आहेत, या माध्यमातून शेतकऱ्यांची व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांची उपजीविका सुरू आहे. केंद्रीय पथकातील तज्ज्ञ म्हणवून घेणारे अधिकारी शेतकºयांना उसाऐवजी भात पीक घ्या, असा सल्ला देताना दिसले.भात हे पीक जास्त पावसाच्या ठिकाणी येते. यावर्षी अतिवृष्टी झाली, पुढच्या वर्षी तेवढाच पाऊस होईल, असे नाही, त्यामुळे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेला हा अनाहूत सल्ला हास्यास्पद ठरला आहे.जिल्ह्यातील शेती, सार्वजनिक मालमत्ता, रस्ते यांचे नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. पाणी योजनांच्या विहिरीमध्ये गाळ साठला आहे. शेतीत पाणी साठून पिके वाया गेली आहेत. अजूनही ठिकठिकाणी पंचनाम्यासाठीही कोणी फिरकले नसल्याच्या शेतकºयांकडून तक्रारी येत आहेत.

अंगापूर परिसरात पंचनामे करण्याआधीच ६५ मिलिमीटर पावसाचा निकष लावला असल्याने शेतकरी मदत मिळेल का ? या चिंतेत आहेत. प्रशासनाचे पंचनामे म्हणजे रामायणातील वानराचे शेपूट असल्याची टीकाही होत आहे.भागाबाई शेलारांना न्याय मिळणार का?सातारा तालुक्यातील पाटेघर रोहोट भागात राहणाऱ्या भागाबाई आनंदा शेलार (वय ८९) ६ आॅगस्ट रोजी राहत्या घरात अंगावर भिंत पडून मृत्यू झाला होता. या घटनेचा पंचनामाही झाला. भागाबार्इंच्या कुटुंबीयांना अद्याप शासनाने कोणतीच मदत केलेली नाही. आपत्तीत मृत्यू झाल्यास शासनाकडून चार लाख रुपये मिळतात. या मदतीचे काय झाले? हा प्रश्न आहे.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर