शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात केंद्राने मदत केली; राज्य सरकारने पाठ थोपटून घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

म्हसवड : ‘कोरोनाविरोधात संघर्ष करताना वर्षभरात केंद्र सरकारने राज्य सरकारला लागेल ती मदत केली आहे. कोरोना काळात बहुतांशी योजना ...

म्हसवड : ‘कोरोनाविरोधात संघर्ष करताना वर्षभरात केंद्र सरकारने राज्य सरकारला लागेल ती मदत केली आहे. कोरोना काळात बहुतांशी योजना केंद्रानेच राबविल्या आहेत. राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. जम्बो हॉस्पिटल उभारण्यात काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला आहे. सातारा जिल्ह्यातील जम्बो हॉस्पिटलच्या जादा खर्चाची चौकशी करावी,’ अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ‘कोरोनाविरुद्ध लढाई लढताना राज्याने केंद्राच्याच बहुतांशी योजना राबविल्या आहेत. राज्याने स्वतःची पाठ थोपटून घेताना केंद्राने किती व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट दिली, राज्याने किती घेतली, याची आकडेवारी जाहीर करावी. सध्या सुरू असलेले लसीकरणही केंद्राकडूनच सुरू आहे. राज्यातील जनतेला मिळत असलेले स्वस्त धान्यही केंद्रामुळेच मिळत आहे. धान, कापूस खरेदीतही केंद्राचीच मदत होत आहे. जीएसटीचा परतावाही दरवर्षी राज्याला मिळत आहे. केंद्राने काहीच केले नाही, असे सांगताना राज्याने काय केले हे ही जनतेला सांगण्याची गरज आहे. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राने केलेल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे, मात्र त्याचवेळी काही ठराविक अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करुन भ्रष्टाचार केला आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे.’

‘जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना जिल्हा रुग्णालय, इतर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार केले जात होते. अखेरीस जिल्ह्यात जम्बो कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यातील अतिदक्षता, व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन प्लांटसाठी किती खर्च झाला. रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची जादा दराने का खरेदी केली, याची चौकशी झाली पाहिजे. जम्बो रुग्णालयाला जिल्हा नियोजन मंडळाकडूनही भरीव निधी देण्यात आला होता. स्वयंसेवी संस्थांनी मोठी मदत केली होती. या रुग्णालयाच्या उभारणीचा हिशोब समोर यायला हवा,’ असे मतही आमदार गोरे यांनी व्यक्त केले.

चौकट .....

वीजजोड तोडायचे सोडा, नवीन द्या

कोरोना काळात आलेली भरमसाठ वीजबिले माफ करु, नंतर कमी करु, अशी आश्वासने राज्य सरकारने दिली. मात्र, सध्या वीजबिल न भरणाऱ्यांची जोडणी तोडली जात आहे. यावर्षी पीकपाणी चांगले आहे. शेतकऱ्यांना आता विजेची गरज आहे. त्यामुळे वीज जोडणी तोडायची थांबवून मागेल त्या शेतकऱ्याला नवीन वीज जोडणी द्यावी, अशी मागणीही आमदार गोरे यांनी केली.