शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

छावणीतील जनावरे येणार घरच्या दावणीला! शासन निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:25 IST

दुष्काळी भागातील पशुधन वाचावे म्हणून राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला; पण चालकांना ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवता येणार आहेत.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत आश्रय : पुरेसा पाऊस नाही; शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे;

नितीन काळेल ।सातारा : दुष्काळी भागातील पशुधन वाचावे म्हणून राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला; पण चालकांना ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवता येणार आहेत. कारण, पुढील आदेशाचे पत्र चालकांच्या हातात पडलेच नाही. त्यामुळे छावणीच्या आश्रयाला असणारी जनावरे घरच्या दावणीला येणार असून, पुरेसा पाऊस अन् चाराही नसल्याने शेतकºयांच्या डोक्याचा पार भुगा झालाय.

गेल्यावर्षी राज्यात अपुरा पाऊस झाला, त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाची चाहूल लागली होती. परिणामी राज्य शासनालाही आॅक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी सातारा जिल्ह्यातही दुष्काळाची मोठी दाहकता होती. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात दिवाळीनंतरच पाणी आणि चारा टंचाईची स्थिती निर्माण झालेली. त्यावेळी राज्य शासनामधील मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाचे दौरे करून माहिती घेतली. नोव्हेंबरमध्ये तर मंत्री एकनाथ शिंदे दुष्काळी दौºयावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. तेव्हा माण तालुक्यात चारा नाही, त्यामुळे लवकरच छावण्या सुरू कराव्या लागतील, असे स्पष्ट केले होते; पण प्रत्यक्षात छावण्या पाच महिने उशिरा म्हणजे एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या.

सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात ९८ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये ७२ हजारांहून अधिक पशुधन आश्रयाला आहे. माण तालुक्यात मोठी दाहकता आहे. माणमध्ये ८१ छावण्यांना मंजुरी असलीतरी प्रत्यक्षात ७६ सुरू असून, त्यामध्ये ५७ हजार ४१७ जनावरे आहेत. खटाव तालुक्यात १५ छावण्या सुरू असून, ७ हजार ७२६ जनावरे तर फलटणमध्ये ५ छावण्यात ५ हजार २९१ जनावरे आहेत. या जनावरांना शासनाच्या नियमाप्रमाणे चारा, खाद्य आणि पाणी मिळत असलेतरी ते ३० जूनपर्यंतच देण्यात येणार आहे., त्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झालीय.

शासन आदेशानुसार ३० जूनपर्यंतच चालकांना छावण्या सुरू ठेवता येतील. कारण, त्यापुढील काहीच आदेश जिल्हा पातळीवर प्राप्त नाही. त्यामुळे अनेक चालकांकडून छावणीतील शेतकºयांनाही ३० जूनपर्यंतच छावणी सुरू राहील, असं तोंडी सांगण्यात आलंय, त्यामुळे शेतकºयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, अद्यापही दुष्काळी भागात म्हणावसा पाऊस झालेला नाही.

काही ठिकाणी तर पूर्ण पाठ फिरवलीय. त्यामुळे जनावरे घरी नेली तर चारा कोठून आणायचा? विकत घ्यायचा झाला तर जवळपास ५०-६० किलोमीटरमध्ये तो मिळणं अवघड आहे. तसेच त्यासाठी पैसे कोठून आणायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांचे मोहळ शेतकºयांभोवती घोंगावत आहे. त्यासाठी शासन स्तरावर निर्णय होऊन पाऊस चांगला होईपर्यंत आणखी दोन-तीन महिने तरी छावण्या सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.शासनाच्या धोरणाबद्दल अधिकारी अनभिज्ञजिल्ह्यातील चारा छावण्यांना ३० जूनपर्यंतच मुदत असल्याचे अधिकाºयांनी मान्य करत पुढील काही निर्णय आमच्याकडे आला नसल्याचे सांगितले. तसेच शासन छावण्यांची मुदत पुढे वाढविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणार का? याबद्दलही अधिक सांगण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाचा निर्णय लवकर होणे अपेक्षित आहे. नाहीतर छावणीची जनावरे चारा नसणाºया दावणीला आणावी लागणार आहेत.

 

चारा छावण्यांना ३० जूनपर्यंत मुदत आहे. असे असलेतरी दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील जनावरांना छावणीचाच आधार आहे. शासन शेतकºयांच्या बाजूने निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. तसेच आमची वरकुटे मलवडी येथील सद्गुरू हरिबुवा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चालविली जाणारी छावणी सामाजिक बांधिलकीतून या पुढेही सुरू ठेवूून शेतकºयांना दिलास देऊ.- शिवाजीराव शिंदे, छावणी चालकअनेक ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसे होणार नसेल तर शासनाला छावण्या सुरू ठेवण्यास भाग पाडू. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झालीय. तेही आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक आहेत.- जयकुमार गोरे, आमदार 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरchavaniछावणी