शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पूर मानवनिर्मित, पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 5:10 PM

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपूर मानवनिर्मित असल्याचा कोकाटे यांचा आरोपपूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी

सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या लोकांची घरे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पडली आहेत, त्यांना शासनाच्यावतीने पक्की घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.कोकाटे म्हणाले, या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरामुळे माणसे, जनावरे, घरे, शेती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील अनेक घरे पडलेली आहेत. ज्या घरात पाणी गेले आहे, ती घरे जीवितास धोकादायक आहेत, त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत, ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते, या शेतीचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. शासनाने सरसकट शेतकरी व शेतमजूर यांना नुकसान भरपाई द्यावी. पशुधन ही ग्रामीण भागातील समांतर अर्थव्यवस्था आहे. अनेक जनावरे दगावली आहेत, वाचलेल्या जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश मोफत द्यावेत.हा पूर मानवनिर्मित असल्याचा आरोप करुन कोकाटे पुढे म्हणाले, कर्नाटक सरकार बनाव करत आहे. अलमट्टी धरण हे १२३ टीएमसीचे नसून २२३ टीएमसीचे आहे. कृष्णेचे अतिरिक्त पाणी कऱ्हाड  येथून उचलून सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबादमधील दुष्काळी गावांना देण्यासाठी शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून निर्णय घ्यावा.यावेळी निसार मुल्ला, अमोल संकपाळ, राहुल बर्गे, प्रशांत यादव, प्रमोद काटे, सुनील भोसले, सूर्यकांत चव्हाण, सत्यजित सानप, राजन सूर्यवंशी, ज्योतिराम यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर