शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:46 IST

गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून

नितीन काळेलसातारा : गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून गेल्या आहेत. शेततळे भरले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे उन्हाळ्यातही ओढ्याला पाणी वाहत असून, जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव दुष्काळी. तसे पाहिलं तर गाव माळरानावर वसलेलं. येथील शेती पूर्णपणे पावसाच्या भरवशावर. ज्यावर्षी चांगला पाऊस पडेल तेव्हा खरीप व रब्बी हंगाम घेता यायचा; पण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती व्हायची. लोकांना टँकरने पाणी मिळायचं; पण येथील मेंढपाळांना पाण्यासाठी दूरदूरवर जायला लागायचं. असं असताना गेल्या दोन-तीन वर्षांपासून येथील चित्र बदलू लागलं आहे. ग्रामस्थांची एकी आणि तरुणांचा सहभाग वाढल्यामुळे जलसंधारणाची कामं होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी एका जुन्या पाझर तलावाची व बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याने लोकांना जलसंधारणाचं महत्त्व समजलं. त्यातूनच यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला.

गावचे सुपुत्र व आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव स्पर्धेत उतरलं. त्यानंतर सरपंच रंजना बनगर, उपसरपंच सागर बनगर, पाण्यासाठी सुरुवातीपासून तळमळीने पुढे येऊन काम करणारे ग्रामपंचायत सदस्य विक्रम शिंगाडे यांनी वॉटर कप स्पर्धेचं काम हाती घेतलं. लोकांमध्ये जागृती केली. त्यामुळे सलग ४५ दिवस दररोज ३५० ते ४०० ग्रामस्थ श्रमदान करीत होते. उन्हातान्हाची पर्वा न करता त्यांचे हे काम सुरू होतं. त्यामुळेच स्पर्धेतील उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालं आहे. याचा फायदाही आता दिसून आला आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वळवाचा पहिला पाऊस बनगरवाडी परिसरात झाला. ओढ्यानं वाहून जाणारं पाणी जागोजागी अडविल्याने विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे वरूनही हातानं पाणी घेता येईल, अशी स्थिती आहे. शेततळ्यात हजारो लिटरचा पाणीसाठा झाला आहे. ओढ्याला पाणी वाहत असल्याने मेंढपाळांना पाणी उपलब्ध झालं आहे. पहिल्याच वॉटर कप स्पर्धेतील या यशाने गावाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे गावानं आता यापुढेही जलसंधारणाचं काम सुरूच ठेवण्याचा निश्चय केला आहे.दुष्काळी माण तालुक्यातील बनगरवाडीत यंदा झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पहिल्याच पावसात विहिरी तुडुंब भरल्या.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई