शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:46 IST

गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून

नितीन काळेलसातारा : गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून गेल्या आहेत. शेततळे भरले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे उन्हाळ्यातही ओढ्याला पाणी वाहत असून, जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव दुष्काळी. तसे पाहिलं तर गाव माळरानावर वसलेलं. येथील शेती पूर्णपणे पावसाच्या भरवशावर. ज्यावर्षी चांगला पाऊस पडेल तेव्हा खरीप व रब्बी हंगाम घेता यायचा; पण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती व्हायची. लोकांना टँकरने पाणी मिळायचं; पण येथील मेंढपाळांना पाण्यासाठी दूरदूरवर जायला लागायचं. असं असताना गेल्या दोन-तीन वर्षांपासून येथील चित्र बदलू लागलं आहे. ग्रामस्थांची एकी आणि तरुणांचा सहभाग वाढल्यामुळे जलसंधारणाची कामं होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी एका जुन्या पाझर तलावाची व बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याने लोकांना जलसंधारणाचं महत्त्व समजलं. त्यातूनच यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला.

गावचे सुपुत्र व आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव स्पर्धेत उतरलं. त्यानंतर सरपंच रंजना बनगर, उपसरपंच सागर बनगर, पाण्यासाठी सुरुवातीपासून तळमळीने पुढे येऊन काम करणारे ग्रामपंचायत सदस्य विक्रम शिंगाडे यांनी वॉटर कप स्पर्धेचं काम हाती घेतलं. लोकांमध्ये जागृती केली. त्यामुळे सलग ४५ दिवस दररोज ३५० ते ४०० ग्रामस्थ श्रमदान करीत होते. उन्हातान्हाची पर्वा न करता त्यांचे हे काम सुरू होतं. त्यामुळेच स्पर्धेतील उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालं आहे. याचा फायदाही आता दिसून आला आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वळवाचा पहिला पाऊस बनगरवाडी परिसरात झाला. ओढ्यानं वाहून जाणारं पाणी जागोजागी अडविल्याने विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे वरूनही हातानं पाणी घेता येईल, अशी स्थिती आहे. शेततळ्यात हजारो लिटरचा पाणीसाठा झाला आहे. ओढ्याला पाणी वाहत असल्याने मेंढपाळांना पाणी उपलब्ध झालं आहे. पहिल्याच वॉटर कप स्पर्धेतील या यशाने गावाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे गावानं आता यापुढेही जलसंधारणाचं काम सुरूच ठेवण्याचा निश्चय केला आहे.दुष्काळी माण तालुक्यातील बनगरवाडीत यंदा झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पहिल्याच पावसात विहिरी तुडुंब भरल्या.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई