शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सातारा: आंधळी धरण भरले! सिंचनाचा प्रश्न मिटणार, माणगंगा नदी आता जोमाने वाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:30 IST

या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

नवनाथ जगदाळेदहिवडी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले माणगंगा नदीवरील आंधळी धरण गुरुवारी सकाळी ६ वाजता भरले. सांडव्यातून पाणी पडल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे.माण तालुक्यातील ढाकणी, राणंद, गंगोती, लोधवडे हे तलाव भरले असून गुरुवारी आंधळी धरण भरले आहे, तर ब्रिटिशकालीन पिंगळी तलावामध्येही पाण्याची मोठी आवक चालू आहे. याशिवाय झाशी तलावही भरण्याच्या मार्गावर असून महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी आणि जांभूळणी तलाव भरण्याचे अद्याप बाकी आहे.माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस कमी होता. मात्र, परतीच्या पावसाने विशेषत: ऑक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. आंधळी पाणलोटामध्येही गेले आठ दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे माणगंगा नदीवर असलेल्या आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. त्यानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.

या धरणाचा पाणीसाठा ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा असल्याने या धरणावर बिदाल, आंधळी, टाकेवाडी, पांगरी, बोडके, दहिवडी गोंदवले या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अवलंबून असल्याने तो प्रश्न आता सुटला आहे. माणगंगा नदीवर असणारे ३० ते ४० बंधारे भरले असल्याने आता माणगंगा पूर्णपणे वाहती झाली आहे.

चौदा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीआंधळी धरणामध्ये ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा पाणीसाठा होत असतो. या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

आंधळी आतापर्यंत दहा वेळा भरलेया आंधळी धरणाचे काम २००० साली पूर्ण झाले. त्यानंतर आज हे धरण दहाव्यांदा भरले. याअगोदर भरलेल्या तारखा पुढीलप्रमाणे - ८ ऑक्टोबर २००१, १ सप्टेंबर २००५, १० ऑगस्ट २००६, १० जुलै २००७, ९ सप्टेंबर २००९, ११ ऑगस्ट २०१०, २६ सप्टेंबर २०१३, २३ ऑक्टोबर २०१९, १९ सप्टेंबर २०२०, २० ऑक्टोबर २०२२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरण