शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: आंधळी धरण भरले! सिंचनाचा प्रश्न मिटणार, माणगंगा नदी आता जोमाने वाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:30 IST

या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

नवनाथ जगदाळेदहिवडी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले माणगंगा नदीवरील आंधळी धरण गुरुवारी सकाळी ६ वाजता भरले. सांडव्यातून पाणी पडल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे.माण तालुक्यातील ढाकणी, राणंद, गंगोती, लोधवडे हे तलाव भरले असून गुरुवारी आंधळी धरण भरले आहे, तर ब्रिटिशकालीन पिंगळी तलावामध्येही पाण्याची मोठी आवक चालू आहे. याशिवाय झाशी तलावही भरण्याच्या मार्गावर असून महाबळेश्वरवाडी, मासाळवाडी आणि जांभूळणी तलाव भरण्याचे अद्याप बाकी आहे.माण तालुक्यात सुरुवातीला पाऊस कमी होता. मात्र, परतीच्या पावसाने विशेषत: ऑक्टोबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. आंधळी पाणलोटामध्येही गेले आठ दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे माणगंगा नदीवर असलेल्या आंधळी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. त्यानंतर हे धरण पूर्ण क्षमतेने भरले.

या धरणाचा पाणीसाठा ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा असल्याने या धरणावर बिदाल, आंधळी, टाकेवाडी, पांगरी, बोडके, दहिवडी गोंदवले या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न अवलंबून असल्याने तो प्रश्न आता सुटला आहे. माणगंगा नदीवर असणारे ३० ते ४० बंधारे भरले असल्याने आता माणगंगा पूर्णपणे वाहती झाली आहे.

चौदा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखालीआंधळी धरणामध्ये ०.२६७ अब्ज घनमीटर एवढा पाणीसाठा होत असतो. या धरणाच्या माध्यमातून डावा व उजवा कालवा अपूर्ण असून हा पूर्ण झाल्यास १४५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

आंधळी आतापर्यंत दहा वेळा भरलेया आंधळी धरणाचे काम २००० साली पूर्ण झाले. त्यानंतर आज हे धरण दहाव्यांदा भरले. याअगोदर भरलेल्या तारखा पुढीलप्रमाणे - ८ ऑक्टोबर २००१, १ सप्टेंबर २००५, १० ऑगस्ट २००६, १० जुलै २००७, ९ सप्टेंबर २००९, ११ ऑगस्ट २०१०, २६ सप्टेंबर २०१३, २३ ऑक्टोबर २०१९, १९ सप्टेंबर २०२०, २० ऑक्टोबर २०२२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरण