शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

‘ग्रामपंचायत’बाबतचे भाजपचे दावे खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:45 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे चित्र जनतेसमोर आले असते; परंतु ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचे खोटे दावे करून भाजप गुजरात निवडणुकीतील फंडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे चित्र जनतेसमोर आले असते; परंतु ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचे खोटे दावे करून भाजप गुजरात निवडणुकीतील फंडा राबवत आहे,’ अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार मुंडे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप भरघोस यश मिळाल्याचा खोटा दावा करीत आहे आणि त्यास पंतप्रधानदेखील ट्विट करून अभिनंदन करतात. हे इतिहासात प्रथमच घडले आहे. तसेच हिमाचलच्या बरोबरीने गुजरातची निवडणूक ही आयोगाने जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, गुजरातमध्ये भूमिपूजने आणि उद्घाटने करण्याची संधी मिळावी, यासाठी गुजरात निवडणूक आयोगाने घोषणा केली नाही. यावरून निवडणूक आयोग देखील सरकारच्या दबावाखाली काम करतोय का? असा प्रश्न पडतो.’सरकारने कर्जमाफी योजनेत चावडी वाचन घेऊन शेतकºयांचा अवमान केला आहे. राज्यात शेतीमालाला हमीभाव नाही, भारनियमनामुळे अर्धे राज्य अंधारात आहे. पेट्रोलसह महागाई प्रचंड वाढली असून, जनतेच्या मनात सरकार विरोधात रोष निर्माण झाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जेव्हा जनतेच्या लक्षात येते की, विकास होत नाही तेव्हा-तेव्हा भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आहे. या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दोन्ही दात वेगळे आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.राजेंच्या वादाचा राष्ट्रवादीशी संबंध नाहीखासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये आनेवाडी टोलनाक्यावरून जो वाद सुरू आहे, त्याच्याशी राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नाही.या वादात पक्षनेतृत्वाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही वाद निर्माण झाला त्यावर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार योग्य निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही मुंडे यांनी केले.