शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मायणी चांदणी चौक परिसरातील सांडपाण्याची दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

मायणी : मायणी (ता. खटाव) येथील चांदणी चौकामध्ये राज्यमार्गाच्या गटारीचे बांधकाम न करताच रस्त्याचे काम सुरू केल्याने संपूर्ण चौक ...

मायणी : मायणी (ता. खटाव) येथील चांदणी चौकामध्ये राज्यमार्गाच्या गटारीचे बांधकाम न करताच रस्त्याचे काम सुरू केल्याने संपूर्ण चौक परिसरामध्ये गटारीचे पाणी साठले आहे. या साठलेल्या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. या कामावर सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून, संबंधित ठेकेदाराच्या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.

मायणी परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. गतवर्षी जानेवारीपासून ते आजअखेरपर्यंत मायणी मुख्य बाजारपेठेतील फक्त सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतराचे काम चालू आहे, तेही काम अजून पूर्णत्वाकडे गेले नाही. या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरातील अनेक ठिकाणचे गटारीचे काम अनेक कारणांमुळे अर्धवट अवस्थेत पडून आहे. यावर कोणताही तोडगा किंवा उपाययोजना होताना दिसत नाही.

येथील मुख्य चांदणी चौक परिसरातील मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेले गटारीचे बांधकाम अनेक ठिकाणी गेल्या चार-पाच महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे, तर गेल्या आठवड्यापासून याच चांदणी चौकातून जाणाऱ्या मिरज-भिगवण नियोजित (राष्ट्रीय महामार्गाच्या) छेदाच्या दोन्ही बाजूचे सुमारे पन्नास मीटर अंतराचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत व नियोजनशून्य असल्याने रखडले आहे. या संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य तोडगा व उपाययोजना होताना दिसत नसल्याने या चांदणी चौकातील व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली.

चौकट :

नियोजनाचा अभाव.. कामे अर्धवट..

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे मायणी ते दिघंची या सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या कामावर सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालय पंढरपूर यांचे नियंत्रण आहे. मात्र या विभागाचे संबंधित अधिकारी या कामाकडे पूर्णवेळ लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे या कामादरम्यान अनेक तक्रारी, वादविवाद, नियोजनाचा अभाव व काम अर्धवट राहताना आहे.

(चौकट )

रहदारीच्या ठिकाणची कामे मार्गी लावा..

चांदणी चौक परिसराकडे मायणी गावाचा बाजारपेठेचा व दळणवळणाचा भाग म्हणून पाहिले जाते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवासी वसाहत, व्यापारी गाळे तसेच वाहनचालक खरेदीसाठी व व्यवसायासाठी वाहने उभी करत असतात. याचमार्गाने शेकडो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे वास्तविक पाहता या रहदारीच्या ठिकाणचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे होते.

25मायणी सांडपाणी

मायणी येथील मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गाच्या छेदाच्या ठिकाणी असलेल्या चांदणी चौकामध्ये असे सांडपाणी साठले आहे. (छाया : संदीप कुंभार)