शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी, जाणून घ्या प्रमुख धरणातील पाणीसाठा

By नितीन काळेल | Updated: August 31, 2023 13:25 IST

धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ छाया गडद असून यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होईना असे स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात टंचाईचे तसेच शेती पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्यस्थितीत पश्चिमेकडील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडीसह मोठे सहा प्रकल्प भरण्यासाठी २८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर या प्रमुख धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी आहे.जिल्ह्यात चार-पाच वर्षांतून दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये दुष्काळाने लोकांना हैराण करुन सोडले होते. चार लाखांवर लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. तसेच माण, खटाव तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, सप्टेंबर महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व भागातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे.तर दुसरीकडे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी धरणे अजून भरलेली नाहीत. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्येही पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे भरणार का याविषयी साशंकता आहे. कारण, बलकवडीसारखे धरण काठावर असलेतरी इतर धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. या धरणात सध्या १२१.६७ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर गतवर्षी या धरणात १४१.१९ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यावेळी पाऊस सुरुच असल्याने धरणांतून विसर्ग सुरू होता. तसेच ही धरणे ९५ टक्क्यांपर्यंत भरलेली.मात्र, यावर्षी उलट स्थिती झालेली आहे. त्यातच या धरणक्षेत्रात पावसाची तूट मोठी आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा १४१८ मिलीमीटर पाऊस कमी झालेला आहे. मागीलवर्षी ३० आॅगस्टपर्यंत या प्रमुख सहा धरणक्षेत्रात तब्बल ९ हजार ४९६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा ८ हजार ७८ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यातल्या त्यात तारळी, बलकवडी धरणाची स्थिती चांगली आहे. पण, कोयना आणि उरमोडी भरण्यासाठी सतत आणि मोठ्या पावसाची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ