शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी, जाणून घ्या प्रमुख धरणातील पाणीसाठा

By नितीन काळेल | Updated: August 31, 2023 13:25 IST

धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ छाया गडद असून यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होईना असे स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात टंचाईचे तसेच शेती पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्यस्थितीत पश्चिमेकडील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडीसह मोठे सहा प्रकल्प भरण्यासाठी २८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर या प्रमुख धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी आहे.जिल्ह्यात चार-पाच वर्षांतून दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये दुष्काळाने लोकांना हैराण करुन सोडले होते. चार लाखांवर लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. तसेच माण, खटाव तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, सप्टेंबर महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व भागातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे.तर दुसरीकडे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी धरणे अजून भरलेली नाहीत. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्येही पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे भरणार का याविषयी साशंकता आहे. कारण, बलकवडीसारखे धरण काठावर असलेतरी इतर धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. या धरणात सध्या १२१.६७ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर गतवर्षी या धरणात १४१.१९ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यावेळी पाऊस सुरुच असल्याने धरणांतून विसर्ग सुरू होता. तसेच ही धरणे ९५ टक्क्यांपर्यंत भरलेली.मात्र, यावर्षी उलट स्थिती झालेली आहे. त्यातच या धरणक्षेत्रात पावसाची तूट मोठी आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा १४१८ मिलीमीटर पाऊस कमी झालेला आहे. मागीलवर्षी ३० आॅगस्टपर्यंत या प्रमुख सहा धरणक्षेत्रात तब्बल ९ हजार ४९६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा ८ हजार ७८ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यातल्या त्यात तारळी, बलकवडी धरणाची स्थिती चांगली आहे. पण, कोयना आणि उरमोडी भरण्यासाठी सतत आणि मोठ्या पावसाची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ