शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:57 IST

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..

सातारा : ‘राज्य आणि देशही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानादिवशी वाढदिवस साजरा होतो, यासारखी वेदनादायी गोष्ट नाही. त्यांनी गादीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचाही वारसा चालवावा,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केली.सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर प्रथमच साताऱ्यात आल्यानंतर सावंत यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.प्रदेश सरचिटणीस सावंत म्हणाले, काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. राज्यात आता काँग्रेसच्या मजबूत संघटनासाठी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे; पण राज्य आणि देशात सुरू झालेले राजकारण हे देशाला अस्ताकडे नेणारे आहे. विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होतोय. जाती, धर्मात संघर्ष व्हावा, अशीच भूमिका आहे. देशात ११ वर्षांपासून भाजप सत्तेत असून, लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही काँग्रेसला साथ द्यावी लागेल. कारण, विरोधी पक्षच राहिला नाहीतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणाराच कोणी राहणार नाही.इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? जगातील मोठा पक्ष म्हणून भाजप सांगते. मग, त्यांना इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? असे सांगून सचिन सावंत पुढे म्हणाले, निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये दिले नाहीत. महाराष्ट्र तर कर्जात बुडालाय, उद्योग क्षेत्रात पिछेहाट झाली आहे, हे सर्व सोडून औरंगजेबच्या कबरीचा, दिशा सालियान सारखे प्रश्न उपस्थित करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. राज्यातील सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमात दंगे आणि विद्वेषाचेच राजकारण केले आहे.

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांनी पत्रकारांच्याही विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करणार आहे. यासाठी बूथपर्यंत पोहोचणार आहोत. संविधानावरील आक्रमण रोखण्यासाठी लोकांनीही काँग्रेसला साथ द्यावी, असे स्पष्ट केले. तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नावर सावंत यांनी ही निवडणूक सरकारी वकिलांच्या माध्यमातून पुढे ढकलली जात आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आवश्यक तेथे एकत्र येणार आहाेत. तरीही काँग्रेस नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपाShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले