शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

तब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 2:55 PM

पिंपोडे बुद्रुक : नांदवळ, ता. कोरेगाव येथील धरण तीन वर्षांनी भरले असून, दुष्काळी उत्तर कोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

ठळक मुद्देतब्बल तीन वर्षांनंतर भरले नांदवळ धरण, बळीराजा सुखावला नांदवळ, सोळशी, नायगाव, सोनके, पिंपोडे बुद्रुक गावच्या पाण्याचा प्रश्न निकाली

पिंपोडे बुद्रुक : नांदवळ, ता. कोरेगाव येथील धरण तीन वर्षांनी भरले असून, दुष्काळी उत्तर कोरेगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या धरणातून परिसरातील नांदवळ, सोनके, पिंपोडे बुदु्रक या गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळते. धरण भरले असल्याने येथील बळीराजा सुखावला आहे.नांदवळसह सोळशी, नायगाव, सोनके, पिंपोडे बुद्रुक गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सलग दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे धरण कोरडे पडल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न पडले होते. त्यामुळे पाण्याचा विषय गंभीर बनला होता. उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांना जुलैपर्यंत टँॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी धरणात सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याचा विसर्ग अतिशय कमी असल्याने पाणीसाठा होण्यात अडचणी निर्माण होत होत्या.नांदवळ धरण १९७२ मध्ये बांधण्यात आले आहे. त्याची खोली ७.२० मीटर इतकी असून, पाणी साठवण क्षमता ६३.२१ दशलक्ष घनफूट आहे. एक महिनाभर पडलेल्या संततधार पावसाने गेल्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वसना नदी पात्रात होत आहे, त्यामुळे आधीच भरून वाहणाºया वसना नदीत अतिरिक्त पाणी येत असून, यावर्षी नदी जास्त काळ प्रवाहित राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे उत्तर कोरेगावकर समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश धुमाळ, अशोकराव लेंभे, वीरसेन पवार, नैनेश कांबळे, मंगल गायकवाड, सिंचन निरीक्षक ए. के. वाल्मिकी, सुधाकर पवार यांनी धरणाच्या पाण्याचे जलपूजन केले.चौकट..उत्तर कोरेगावच्या सर्वच गावांमध्ये गत तीन वर्षांपासून भरीव कामे झाली आहेत. यंदा चांगला मोसमी पावसामुळे वसना नदी, नांदवळ धरण, बंधारे, ओढे, नाले तसेच फाउंडेशनद्वारे झालेल्या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी भूजल पातळी वाढली असून, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित झाल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर