शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर ...

सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.

कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दुचाकी चालवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंद शेखर झडगे (वय २१, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), बाळकृष्ण गुलाब साळुंखे (४५, रा. कुशी, ता. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार सतीश साबळे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार पी. एल. भिसे करीत आहेत.

पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या लक्ष्मण भिकू जाधव (२९, रा. कामाठीपुरा मठाजवळ, ता. सातारा), शेखर गुलाबराव मोरे (३८, रा. १९९, पाण्याच्या टाकीजवळ, गोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संतोष इष्टे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.

पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरण दत्तात्रय गोडसे (३०, रा. जनाई मळाई मंदिर, खिंडवाडी, ता. सातारा), उमेश शांताप्पा कैनूर (३९, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, लक्ष्मी टेकडी, सातारा), सुजाता धनंजय देगांवकर (४०, रा. कुंभारवाडा, केसरकर पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक सचिन पोळ यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या अमृत अर्जुन कुंभार (३१, रा. आदित्यनगर, सातारा), साहिल इन्नुस आत्तार (२६, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर बाबासोा फरांदे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अब्दुल खलिफा यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.

चौकट : तरुण मुले पडताहेत घराबाहेर

शहरामध्ये विनाकारण फिरू नका, असे पोलीस वारंवार लोकांना सांगत आहेत; मात्र तरीसुद्धा अनेकजण पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेषत: तरुण मुले काहीही काम नसताना घराबाहेर पडत आहेत. अशा मुलांवर नाइलाजास्तव कारवाई करावी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.