शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये पाण्याची बाटली ठेवताय? काळजी घ्या, नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 17:57 IST

पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बाटली घसरली अन् चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. अन्

संजय पाटील

कऱ्हाड : रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच; पण चार दिवसांपूर्वी कऱ्हाडनजीक घडलेला अपघात चालकांना विचार करायला लावणारा आहे. कारमध्ये बेजबाबदारपणे ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे काय घडू शकते, हे त्या अपघातातून दिसून आले. संबंधित अपघातात दोन युवक कायमचे जायबंदी झाले असून, सुदैवाने त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली आहे.

कऱ्हाडनजीक कारने दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात होण्यापूर्वी जे घडले ते महत्त्वाचे आहे. कार चालविणाऱ्या चालकाला तहान लागली. त्याने कार चालवितच पाठीमागच्या सिटवर असलेली पाण्याची बाटली घेतली. एक हाथ ‘स्टेअरिंग’वर ठेवून त्याने पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बेजबाबदारपणे ठेवलेली ती बाटली घसरली अन् क्षणात चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. त्यामुळे चालकाला ‘ब्रेक’ दाबता आला नाही. वेग नियंत्रित न झाल्यामुळे अखेर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत कार नाल्यात उलटली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले.

वरवर पाहता हा अपघात नेहमीच्या अपघातांसारखा वाटत असला तरी चालकाचा बेजबाबदारपणा त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अपघात झाला की बहुतांश जण वेळेला दोष देतात. रस्ता किंवा त्यावेळच्या परिस्थितीचे कारण समोर करतात. मात्र, बहुतांश अपघातांना चालकांचाच बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

अकरा महिन्यांतील अपघात (जानेवारी ते ऑक्टोबरअखेर)

अपघात : ३१

मयत : २८

जखमी : १८

विनाहेल्मेट १५ दुचाकीस्वार ठार

कऱ्हाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत ११ महिन्यांत ३१ भीषण अपघात झाले. या अपघातांत मृत झालेल्यांपैकी १५ जण दुचाकीस्वार होते आणि त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याने अपघातात ते ठार झाल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच विनाहेल्मेट प्रवास करणारे अनेक दुचाकीस्वार अपघातांमध्ये जखमी झाले आहेत.

सिटबेल्ट लावायचाही कंटाळा

कऱ्हाडच्या हद्दीतील एकूण अपघातांपैकी १३ अपघातांत कारचा समावेश होता. त्यापैकी दोन कारचालक केवळ सिटबेल्ट न घातल्यानेच मृत्युमुखी पडल्याचे पंचनाम्यावेळी पोलिसांना दिसून आले आहे. बहुतांश कारचालक वाहन चालविताना सिटबेल्ट लावायचा कंटाळा करतात. परिणामी, अपघातात त्यांना गंभीर दुखापत होते. अथवा दुर्दैवी मृत्यू ओढवतो.

कऱ्हाडच्या हद्दीतील अपघात (२०२१ ऑक्टोबरअखेर)

२०१४ : १२५

२०१५ : ४३

२०१६ : ७६

२०१७ : ६१

२०१८ : ५४

२०१९ : ४१

२०२० : ४४

२०२१ : ३१

का होतात अपघात..?

- अप्रशिक्षित वाहनचालक

- चालकाचा अति आत्मविश्वास

- मद्यप्राशन केलेला चालक

- इंडिकेटर न लावणे

- चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’

- असुरक्षितरीत्या वाहन पार्किंग

- रिफ्लेक्टर, रेडीअम, टेललाईट नसणे

अपघाताची कारणे

बेजबाबदार चालक : ४६ टक्के

रस्त्याची दुरवस्था : २१ टक्के

वातावरण : ९ टक्के

नादुरुस्त वाहन : १३ टक्के

इतर : ११ टक्के

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcarकारWaterपाणीAccidentअपघात