शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कारमध्ये पाण्याची बाटली ठेवताय? काळजी घ्या, नाहीतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 17:57 IST

पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बाटली घसरली अन् चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. अन्

संजय पाटील

कऱ्हाड : रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच; पण चार दिवसांपूर्वी कऱ्हाडनजीक घडलेला अपघात चालकांना विचार करायला लावणारा आहे. कारमध्ये बेजबाबदारपणे ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे काय घडू शकते, हे त्या अपघातातून दिसून आले. संबंधित अपघातात दोन युवक कायमचे जायबंदी झाले असून, सुदैवाने त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली आहे.

कऱ्हाडनजीक कारने दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात होण्यापूर्वी जे घडले ते महत्त्वाचे आहे. कार चालविणाऱ्या चालकाला तहान लागली. त्याने कार चालवितच पाठीमागच्या सिटवर असलेली पाण्याची बाटली घेतली. एक हाथ ‘स्टेअरिंग’वर ठेवून त्याने पाणी पिले आणि बाटली गिअरनजीक ठेवली. बेजबाबदारपणे ठेवलेली ती बाटली घसरली अन् क्षणात चालकाच्या पायासमोर ‘ब्रेक पॅडल’खाली अडकली. त्यामुळे चालकाला ‘ब्रेक’ दाबता आला नाही. वेग नियंत्रित न झाल्यामुळे अखेर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देत कार नाल्यात उलटली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले.

वरवर पाहता हा अपघात नेहमीच्या अपघातांसारखा वाटत असला तरी चालकाचा बेजबाबदारपणा त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. अपघात झाला की बहुतांश जण वेळेला दोष देतात. रस्ता किंवा त्यावेळच्या परिस्थितीचे कारण समोर करतात. मात्र, बहुतांश अपघातांना चालकांचाच बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

अकरा महिन्यांतील अपघात (जानेवारी ते ऑक्टोबरअखेर)

अपघात : ३१

मयत : २८

जखमी : १८

विनाहेल्मेट १५ दुचाकीस्वार ठार

कऱ्हाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत ११ महिन्यांत ३१ भीषण अपघात झाले. या अपघातांत मृत झालेल्यांपैकी १५ जण दुचाकीस्वार होते आणि त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याने अपघातात ते ठार झाल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच विनाहेल्मेट प्रवास करणारे अनेक दुचाकीस्वार अपघातांमध्ये जखमी झाले आहेत.

सिटबेल्ट लावायचाही कंटाळा

कऱ्हाडच्या हद्दीतील एकूण अपघातांपैकी १३ अपघातांत कारचा समावेश होता. त्यापैकी दोन कारचालक केवळ सिटबेल्ट न घातल्यानेच मृत्युमुखी पडल्याचे पंचनाम्यावेळी पोलिसांना दिसून आले आहे. बहुतांश कारचालक वाहन चालविताना सिटबेल्ट लावायचा कंटाळा करतात. परिणामी, अपघातात त्यांना गंभीर दुखापत होते. अथवा दुर्दैवी मृत्यू ओढवतो.

कऱ्हाडच्या हद्दीतील अपघात (२०२१ ऑक्टोबरअखेर)

२०१४ : १२५

२०१५ : ४३

२०१६ : ७६

२०१७ : ६१

२०१८ : ५४

२०१९ : ४१

२०२० : ४४

२०२१ : ३१

का होतात अपघात..?

- अप्रशिक्षित वाहनचालक

- चालकाचा अति आत्मविश्वास

- मद्यप्राशन केलेला चालक

- इंडिकेटर न लावणे

- चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’

- असुरक्षितरीत्या वाहन पार्किंग

- रिफ्लेक्टर, रेडीअम, टेललाईट नसणे

अपघाताची कारणे

बेजबाबदार चालक : ४६ टक्के

रस्त्याची दुरवस्था : २१ टक्के

वातावरण : ९ टक्के

नादुरुस्त वाहन : १३ टक्के

इतर : ११ टक्के

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcarकारWaterपाणीAccidentअपघात