शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Satara: उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी, नाल्याच्या कठड्यामुळे दांपत्याचे वाचले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 12:44 PM

वेळ आली होती, पण काळ आला नव्हता

मलकापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या महामार्गाच्या कडेला उभ्या कारवर उसाने भरलेला मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवीन निर्माण झालेल्या नाल्याच्या कठड्यामुळे दोन सैनिक दांपत्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर हद्दीत अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन सैनिक दाम्पत्य आणि कार चालक असे पाच जण (एमएच १२ वायएफ ८७२०)मधून मिलिटरी अपसिंगे (ता. सातारा) येथून देवदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास नांदलापूर येथील अकॅडमिक हाइट पब्लिक स्कूल समोर आले असता चालकाने कार महामार्गाच्या कडेला थांबवली. काही वेळातच पाठीमागून ऊस भरलेला मालट्रक (एमएच ४५ ०८३३) हा भरधाव वेगात येऊन कारवर पलटी झाला.या अपघातात सैनिक दाम्पत्यांसह चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कारसह मालट्रक व उसाच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसाच्या मालासह मालट्रक कारवर पलटी झाला मात्र महामार्गालगत नवीन नाला बांधला आहे. यामुळे मालट्रक व ऊस नाल्यावर पडल्यामुळे व मालट्रकचा पुढील भाग कारच्या बॉनेटवर टेकला. यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच माहामार्ग देखभाल विभागातील क्रेनचे कर्मचारी सुनील कदम, राहुल कदम यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नागरिकांसह वाहनधारकांच्या मदतीने व कदम क्रेनच्या साहाय्याने उसाचा माल बाजूला केला. उसाचा माल बाजूला करत कारमधील पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती शहर व महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कऱ्हाड शहरचे पोलिस कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा करून व उसाचा माल दुसऱ्या वाहनात भरून सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

वेळ आली होती, पण काळ आला नव्हतानांदलापूर हद्दीत पहाटे उसाचा ट्रक कारवर पलटी झाला. मात्र, मालट्रक कारच्या बॉनेटवर टेकला, तर नवीन बनवलेल्या नाल्यावर उसाचा माल टेकल्यामुळे कारमधील पाचही जणांना किरकोळ दुखापत झाली. हाच ट्रक व ऊस कारच्या मधोमध पडाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत काळ आला होता, पण सुदैवाने वेळच आली नव्हती म्हणून सर्व जण सुखरूप बाहेर आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात